शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सनातन वाद : उदयनिधींचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचं बक्षीस, परमहंस आचार्य यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:28 IST

सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही. होय, जर कोणी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल बोलले तर तो नक्कीच नष्ट होईल, असे परमहंस आचार्य म्हणाले.

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayandihi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसह अमित शहा आणि इतर अनेक भाजप नेत्यांनी हिंदू धर्माच्या अपमानाचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, अयोध्येच्या तपस्वी शिबिरातील संत जगतगुरू परमहंस आचार्य यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीबद्दल उदयनिधी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांचा प्रतीकात्मक शिरच्छेद करण्यात आला. 

परमहंस आचार्य म्हणाले की, जो कोणी उदयनिधी यांचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. उदयनिधी यांनी देशातून डास, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांसारखे सनातन धर्म संपवण्याच्या बोलण्याने आपण खूप दुखावलो आहोत, असे परमहंस आचार्य म्हणाले. तसेच, लाखो वर्षांपूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे सनातन धर्म. दोन हजार वर्षापासून काही धर्म रंगलेले धर्म बनले आहेत. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे सनातन धर्म. सनातन धर्माला सुरुवात किंवा अंत नाही. सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही. होय, जर कोणी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल बोलले तर तो नक्कीच नष्ट होईल, असे परमहंस आचार्य म्हणाले.

याचबरोबर, परमहंस आचार्य म्हणाले की, आज मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करतो, द्रमुक नेते उदयनिधी यांचे शीर आणणाऱ्याला मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस देईन. जर कोणी त्यांचे डोके आणले नाही तर मी स्वतः त्यांचा शिरच्छेद करेन. मी तलवार तयार केली आहे. मी स्वतः जाऊन त्याचा शिरच्छेद करणार आहे. याचबरोबर, सनातन धर्म हा मानवतावादी, अहिंसा आहे, हे उदयनिधी यांना माहीत आहे. होय आम्ही मानवतावादी आहोत, परंतु आम्ही राक्षसांना देखील मारतो. उदयनिधी राक्षस बनले आहेत, असेही परमहंस आचार्य यांनी सांगितले.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?तामिळनाडू सरकारमधील क्रिडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. ते म्हणाले होते, "डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणTamilnaduतामिळनाडू