शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

सनातन वाद : उदयनिधींचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचं बक्षीस, परमहंस आचार्य यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:28 IST

सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही. होय, जर कोणी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल बोलले तर तो नक्कीच नष्ट होईल, असे परमहंस आचार्य म्हणाले.

तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayandihi Stalin) यांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांसह अमित शहा आणि इतर अनेक भाजप नेत्यांनी हिंदू धर्माच्या अपमानाचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, अयोध्येच्या तपस्वी शिबिरातील संत जगतगुरू परमहंस आचार्य यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीबद्दल उदयनिधी यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी त्यांचा प्रतीकात्मक शिरच्छेद करण्यात आला. 

परमहंस आचार्य म्हणाले की, जो कोणी उदयनिधी यांचे शिरच्छेद करून आणेल, त्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. उदयनिधी यांनी देशातून डास, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांसारखे सनातन धर्म संपवण्याच्या बोलण्याने आपण खूप दुखावलो आहोत, असे परमहंस आचार्य म्हणाले. तसेच, लाखो वर्षांपूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे सनातन धर्म. दोन हजार वर्षापासून काही धर्म रंगलेले धर्म बनले आहेत. पूर्वी एकच धर्म होता, तो म्हणजे सनातन धर्म. सनातन धर्माला सुरुवात किंवा अंत नाही. सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही. होय, जर कोणी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल बोलले तर तो नक्कीच नष्ट होईल, असे परमहंस आचार्य म्हणाले.

याचबरोबर, परमहंस आचार्य म्हणाले की, आज मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करतो, द्रमुक नेते उदयनिधी यांचे शीर आणणाऱ्याला मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस देईन. जर कोणी त्यांचे डोके आणले नाही तर मी स्वतः त्यांचा शिरच्छेद करेन. मी तलवार तयार केली आहे. मी स्वतः जाऊन त्याचा शिरच्छेद करणार आहे. याचबरोबर, सनातन धर्म हा मानवतावादी, अहिंसा आहे, हे उदयनिधी यांना माहीत आहे. होय आम्ही मानवतावादी आहोत, परंतु आम्ही राक्षसांना देखील मारतो. उदयनिधी राक्षस बनले आहेत, असेही परमहंस आचार्य यांनी सांगितले.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?तामिळनाडू सरकारमधील क्रिडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी (2 सप्टेंबर) चेन्नई येथे बोलताना सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. ते म्हणाले होते, "डासांमुळे डेंग्यू, कोरोना आणि मलेरियासारखे आजार होतात. त्यांचा आपण विरोध करू शकत नाही, त्यांचा नायनाट करावा लागतो. सनातन धर्मही तसाच आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणTamilnaduतामिळनाडू