शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाचे एकत्रीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मिशन 350' च्या रणनितीचा भाग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 18:13 IST

अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल.

चेन्नई, दि. 21 - अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठया प्रमाणावर उलथापालथ झाली. आता सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही गटांना एकत्र आणण्यामागे भाजपाची रणनिती असल्याची चर्चा आहे. भाजपाने या विलीनीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली. 

व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधीच्या सोहळयाला पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी दोघांशी चर्चा केली होती. दोन्ही गटांच्या या एकत्रीकरणानंतर अण्णाद्रमुक आता एनडीएमध्ये सहभागी होईल अशी चर्चा आहे. भाजपाने आतापासूनच 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 

मिशन 2019 मध्ये केंद्राची सत्ता परत मिळवण्यात मोदींना अण्णाद्रमुकच्या एकत्रीकरणाचा फायदा होणार आहे. तामिळनाडूत भाजपाला अजून आपला जनाधार तयार करता आलेला नाही. इथे फक्त अडीच टक्के मते मिळवणा-या भाजपाला निश्चितच या विलीनीकरणाचा भविष्यात लाभ होईल. भाजपाने मिशन 2019 साठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. ते अण्णाद्रमुकमुळे पूर्ण होऊ शकते. 

व्ही.के.शशिकलाच्या कुटुंबाची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी आणि जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाचा सीबीआय तपास या पनीरसेल्वम गटाच्या दोन मुख्य मागण्या होत्या. पन्नीरसेल्वम पक्षाचे निमंत्रक तर ई. पलानीसामी सहनिमंत्रक असतील अशी माहिती समोर आली आहे. शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, ओ. पन्नीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सुकाणू समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षांतर्गत अधिकार येतील. 

या तडजोडीनुसार, पलानीस्वामी यांच्याकडे सरकारची, तर पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.पनीरसेल्वम यांच्या गटाने असा आग्रह केला आहे की, शशिकला यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर सर्व पदाधिका-यांनी स्वाक्ष-या कराव्यात. लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी टीटीव्ही दिनकरन यांना उपमहासचिव पदावरून हटविण्याच्या १० आॅगस्ट रोजीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नव्हती. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे थंबीदुराई यांच्याकडे प्रचार सचिव आणि पक्षाचे खासदार नवनीत कृष्णन व विजिया सत्यानंद यांच्याकडे अनुक्रमे वकील शाखा व महिला शाखेची जबाबदारी देण्यात येईल.