शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पनीरसेल्वम-पलानीस्वामी गटाचे एकत्रीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मिशन 350' च्या रणनितीचा भाग ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 18:13 IST

अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल.

चेन्नई, दि. 21 - अण्णाद्रमुकमधील ओ. पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी यांचा गट एकत्र आल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता संपुष्टात येईल. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठया प्रमाणावर उलथापालथ झाली. आता सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही गटांना एकत्र आणण्यामागे भाजपाची रणनिती असल्याची चर्चा आहे. भाजपाने या विलीनीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली. 

व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या शपथविधीच्या सोहळयाला पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी दोघांशी चर्चा केली होती. दोन्ही गटांच्या या एकत्रीकरणानंतर अण्णाद्रमुक आता एनडीएमध्ये सहभागी होईल अशी चर्चा आहे. भाजपाने आतापासूनच 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. 

मिशन 2019 मध्ये केंद्राची सत्ता परत मिळवण्यात मोदींना अण्णाद्रमुकच्या एकत्रीकरणाचा फायदा होणार आहे. तामिळनाडूत भाजपाला अजून आपला जनाधार तयार करता आलेला नाही. इथे फक्त अडीच टक्के मते मिळवणा-या भाजपाला निश्चितच या विलीनीकरणाचा भविष्यात लाभ होईल. भाजपाने मिशन 2019 साठी 350 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. ते अण्णाद्रमुकमुळे पूर्ण होऊ शकते. 

व्ही.के.शशिकलाच्या कुटुंबाची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी आणि जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाचा सीबीआय तपास या पनीरसेल्वम गटाच्या दोन मुख्य मागण्या होत्या. पन्नीरसेल्वम पक्षाचे निमंत्रक तर ई. पलानीसामी सहनिमंत्रक असतील अशी माहिती समोर आली आहे. शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, ओ. पन्नीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.  ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सुकाणू समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षांतर्गत अधिकार येतील. 

या तडजोडीनुसार, पलानीस्वामी यांच्याकडे सरकारची, तर पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.पनीरसेल्वम यांच्या गटाने असा आग्रह केला आहे की, शशिकला यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर सर्व पदाधिका-यांनी स्वाक्ष-या कराव्यात. लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी टीटीव्ही दिनकरन यांना उपमहासचिव पदावरून हटविण्याच्या १० आॅगस्ट रोजीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नव्हती. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे थंबीदुराई यांच्याकडे प्रचार सचिव आणि पक्षाचे खासदार नवनीत कृष्णन व विजिया सत्यानंद यांच्याकडे अनुक्रमे वकील शाखा व महिला शाखेची जबाबदारी देण्यात येईल.