शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

३०० वटवाघळे मरण पावल्याने घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 23:15 IST

बेलघाट येथे सुमारे ३०० वटवाघळे मरण पावल्याचे आढळून आले ती आमराई ध्रुवनारायण सिंग या व्यक्तीच्या मालकीची आहे.

गोरखपूर : चीनमध्ये वटवाघळातील कोरोना विषाणूचा माणसाला संसर्ग होऊन त्यातून या आजाराची भीषण साथ पसरली, अशी एक शक्यता वर्तविण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या बेलघाट भागातील एका आमराईत सोमवारी ३०० वटवाघळे मरून पडल्याने त्या परिसरातील लोक घाबरून गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच अधिकारीवर्गाने घटनास्थळी धाव घेतली. वटवाघळांचे मृतदेह उत्तरीय तपासणी करण्यासाठी पाठवून देण्यात आले. त्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे या तपासणीचा अहवाल हाती आल्यानंतर स्पष्ट होईल. कोरोना साथीचा व या वटवाघळांचा मृत्यूचा संबंध असल्याच्या अफवा समाजमाध्यमांतून पसरल्याने बेलाघाट परिसरातील नागरिक चिंताग्रस्त झाले होते.

हवेत उकाडा खूप वाढल्याने, तसेच या परिसरात पाण्याचीही टंचाई असल्यामुळे वटवाघळांचा तडफडून मृत्यू झाला असावा अशीही अफवा समाजमाध्यमांत पसरली. त्यामुळे वटवाघळांना पाणी प्यायला मिळावे म्हणून स्थानिक लोकांनी दयाबुद्धीने घराबाहेर भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवले.

बेलघाट येथे सुमारे ३०० वटवाघळे मरण पावल्याचे आढळून आले ती आमराई ध्रुवनारायण सिंग या व्यक्तीच्या मालकीची आहे. त्यांनी सांगितले की, आमराईच्या जवळ असलेल्या झाडांवर ही वटवाघळे राहात होती. तेथून जवळच एक वीटभट्टीही आहे. तिच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणानेही ही वटवाघळे मरण पावली असण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

मृत्यूच्या कारणाबद्दल नाना तर्क

च्गोरखपूर जिल्ह्याचे वनाधिकारी अविनाशकुमार यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने वटवाघळे मरण पावल्याची माहिती सोमवारी सकाळी आठ वाजता मिळाल्यानंतर, वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सुमारे ५८ वटवाघळांचे मृतदेह ताब्यात घेतले व उत्तरीय तपासणीसाठी बरेली येथील इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटला पाठविले. ही वटवाघळे प्रचंड उकाड्याने किंवा कीटकनाशकाचे प्राशन केल्याने मरण पावली असावित, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विषयाचे प्राध्यापक पी. एच. पाठक यांनी सांगितले की, बेलघाटमधील वटवाघळांचा व्हाईट नोज नावाच्या आजाराने मृत्यू झाला असावा, असे वाटते. विदेशात या आजाराने असंख्य वटवाघळे मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या