शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पंडित नेहरूंच्या 'त्या' पत्राने मोदींना आधार, काँग्रेसची बोंब होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 11:56 IST

नोटाबंदीप्रमाणेच यावेळीही मोदी सरकारने काँग्रेसच्या काळातील पुराव्यांचा आधार घेतला आहे.

नवी दिल्ली : आरबीआयसोबत केंद्र सरकारचे उडालेले खटके आणि गव्हर्नर उर्जित पटेल यांना पाठविलेल्या नोटिसीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मात्र, नोटाबंदीप्रमाणेच यावेळीही मोदी सरकारने काँग्रेसच्या काळातील पुराव्यांचा आधार घेतला आहे. यामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत येणार असून निवडणुकीतील आणखी एक मुद्दा हातचा जाण्याची शक्यता आहे. 

बऱ्याचदा सध्या उद्भवलेल्या अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग भूतकाळात सापडतो. मोदी सरकारही आरबीआयसोबतच्या वादावर इतिहासात डोकावत आहे. आरबीआय आमि सरकारमध्ये तणावाची ही काही पहिलीच वेळ नाही, तर 1937 मध्येही वाद निर्माण झाले होते. सर जॉन ऑब्सबॉर्न यांनी व्याज आणि विनिमय दरांवरून मतभेद झाल्यानंतर राजीनामा दिला होता. याबाबतची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही तत्कालीन आरबीआय गव्हर्नर सर बेनेगल रामा राव यांच्याशी वाद घालून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते. हाच मुद्दा काँग्रेसला उर्जित पटेल यांच्याशी झालेल्या मोदी सरकारच्या वादावरून तोंडघशी पाडणार आहे. काँग्रेस भाजपवर आरबीआय या स्वतंत्र संस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असल्याचा आरोप करत आहे. 

सर बेनेगल रामा राव हे मुलकी खात्यातील अधिकारी होते. यानंतर ते भारताचे चौथे गव्हर्नर बनले. त्यांनी 7.5 वर्षांच्या सेवेनंतर 1957 मध्ये राजीनामा दिला होता. मात्र, तेव्हा नेहरू यांनी अर्थमंत्री टीटी कृष्णमाचारी यांच्या सुरात सूर मिसळत आरबीआय ही सरकारच्या विविध प्रशासनांसारखीच एक भागीदार आहे. 

राव यांनी मतभेदांनंतर कृष्णमाचारी हे व्यवहारांमध्ये अडथळा आणत असल्याची तक्रार केली होती. एका अर्थसंकल्पातील प्रस्तावावरून त्यांच्यात खटके उडाले होते. टीटीके यांनी आरबीआयला अर्थमंत्रालयाचाच एक भाग असल्याचे म्हटले होते. तसेच संसदेमध्ये आरबीआयबाबत शंका व्यक्त करताना या संस्थेमध्ये काही विचार करण्याची क्षमता आहे का? असा प्रश्न उपस्थित करत संकुचित असल्याचे म्हटले होते. 

यानंतर नेहरु यांनी आरबीआयच्या गव्हर्नर राव यांना एक पत्र लिहीले होते. यामध्ये त्यांनी आरबीआय ही सरकारला मार्गदर्शन आणि सल्ले देणारी असल्याचे म्हटले होते. तसेच आरबीआयला सरकारच्या आदेशांचे पालन करायला हवे. गव्हर्नरला जेव्हा असे वाटेल की आपण या पदावर राहू शकत नाही तेव्हा ते राजीनामा देऊ शकतात, असा सल्लाही दिला होता. यानंतर काही दिवसांत राव यांनी राजीनामा दिला होता. 

केंद्राविरोधात आरबीआयची धोरणे नसावीतनेहरू यांनी राव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही भेटलेला तेव्हा मी म्हणालेलो की, धोरणे ठरविण्याचे कामा केंद्र सरकारचे आहे. यामुळे स्वाभाविक आहे की, केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आरबीआयची धोरणे असूच शकत नाहीत. यावेळी तुम्ही याला होकारही दिला होता. तरीही मला तुमचा वेगळा मार्ग दिसत आहे. 

नोटाबंदी आणि इंदिरा गांधीइंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना 1971 मध्ये वांचू समितीने नोटाबंदी करण्याची सूचना केली होती. मात्र, निवडणुकांमध्ये फटका बसण्याच्या भीतीने इंदिरा यांनी टाळले होते. याच सूचनेचा आधार नंतर नोटाबंदीच्या टीकेवेळी मोदी सरकारने घेतला होता. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकUrjit Patelउर्जित पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू