शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ऐकावं ते नवलच! एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी; मतदार यादीत मोठा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 10:47 IST

Panchayat Election News : अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली - निवडणूक जवळ आल्यानंतर बऱ्याचदा अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ झालेला पाहायला मिळतो. अनेकांची नावं ही यादीतून गायब असतात. तर काही ठिकाणी जास्त मतदारांच्या नावाची नोंद असते. अशीच काहीशी अजब घटना आता हिमाचल प्रदेशमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्येही असाच एक घोळ समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करत मतदार यादीच्या विश्वासार्हतेसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. 

आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच काही फोटो शेअर करून निवडणुकींमध्ये काहीतरी घोळ असल्याचा आरोप देखील केला आहे. अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदार यादीचा फोटो शेअर करत एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. 

टाहलीवाल में एक ही मकान एवं पते पर बना दी  102 वोटे,जिनमे अधिकांश प्रवासी। यूँ किया वोटों का गोरखधंधा।

Posted by Mukesh Agnihotri on Tuesday, January 12, 2021

टाहलीवाल निवडणुकीत झालेल्या घोळामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांचं ओळखपत्र दाखवत असल्याने मतदारयादीच्या विश्वासर्हतेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप देखील मुकेश अग्निहोत्री यांनी केला आहे. मात्र या धक्कादायक प्रकाराबाबत प्रशासनाला अद्याप कोणतीही माहिती नाही. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. 

हरोलीचे उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या गौरव चौधरी यांनी आपल्याला या गोंधळासंदर्भात काहीच कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. कोणी तक्रार केल्यास यासंदर्भात कारवाई केली जाईल असंही चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा मतदारसंघ असलेल्या हरोलीमधील एकमेव नगरपंचायत टाहलीवालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजप समर्थित असलेल्या नगरसेवकांना बहुमत मिळाले, तर काँग्रेस समर्थित उमेदवारांना कमी जागांवर समाधान मानावे लागले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूकVotingमतदानcongressकाँग्रेस