शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पॅनकार्ड, बँक खात्याने नागरिकत्व सिद्ध होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 06:11 IST

आसाममधील ‘एनआरसी’ संदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल

गुवाहाटी : एखाद्या व्यक्तीने भारत सरकारच्या प्राप्तिकर विभागाने दिलेले पॅनकार्ड, भारतातील एखाद्या बँकेतील खात्यातील जमाठेवींचे स्टेटमेंट किंवा भारतात शेतसारा भरत असल्याची पावती यासारखे पुरावे सादर केले तरी तेवढ्यावरून त्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध होत नाही, असा निकाल गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिला आहे.

आसाममध्ये राबविण्याल्या ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’ची (एनआरसी) अंतिम यादी गेल्या आॅगस्टमध्ये प्रसिद्ध झाली. त्यात नागरिकत्वाचे पुरावे अग्राह्य ठरलेल्या १९ लाखांहून अधिक नागरिकांची नावे वगळली गेली. आता हे लोक नागरिकत्व सिद्ध करून ‘एनपीआर’मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी त्या कायद्यानुसार स्थापन केलेल्या विशेष न्यायाधिकरणांकडे दाद मागत आहेत.अशा लोकांपैकीच असलेल्या जबेदा बिवी ऊर्फ जबेदा खातून नावाच्या महिलेने न्यायाधिकरणाकडे अर्ज केला होता. परंतु तो फेटाळून न्यायाधिकरणाने तिला ‘परकीय’ ठरविले. खरे तर ‘एनआरसी’ नोंदणीसाठी शेतसाऱ्याची पावती, पॅनकार्ड किंवा बँक खात्याचे स्टेटमेंट हे ग्राह्य पुरावे होते व तेच या महिलेने सादर केले होते. न्यायाधिकरणाच्या निकालाविरुद्ध जबेदा बेगमने केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. मनोजित भुयान व न्या. पार्थिवज्योती सैकिया यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निकाल दिला. खंडपीठाने यासाठी यात उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेतला. याच खंडपीठाने काही दिवसांपूर्वी दुसºया एका प्रकरणात मतदार ओळखपत्र हाही नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचा निकाल दिला होता. आसाममध्ये ‘एनपीआर’वरून व त्यातही लाखो हिंदूंची नावे वगळली जाण्यावरून प्रचंड असंतोष आहे. नावे वगळलेले लोक अनिश्चित भविश्याच्या चिंतेने ग्रस्त आहेत. (वृत्तसंस्था)नागरिकत्वच अडचणीतदेशभर एनआरसी राबविण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यानंतर अनेक ठिकाणी त्याविरोधात आंदोलने सुरू झाली.आजही ती सुरू आहेत. अशा स्थितीत एनआरसी राबविली गेली आणि वरील कागदपत्रांखेरीज अन्य पुरावे लोकांकडे नसल्यास त्यांच्या नागरिकत्वाचे काय होणार, हा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसीचा मुद्दाच नाही, असे सांगितले आहे, तर ती राबविण्यास काही राज्यांनी विरोध केला आहे.

टॅग्स :AssamआसामPan Cardपॅन कार्डcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक