शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

पॅनकार्ड, बँक खात्याने नागरिकत्व सिद्ध होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 06:11 IST

आसाममधील ‘एनआरसी’ संदर्भात उच्च न्यायालयाचा निकाल

गुवाहाटी : एखाद्या व्यक्तीने भारत सरकारच्या प्राप्तिकर विभागाने दिलेले पॅनकार्ड, भारतातील एखाद्या बँकेतील खात्यातील जमाठेवींचे स्टेटमेंट किंवा भारतात शेतसारा भरत असल्याची पावती यासारखे पुरावे सादर केले तरी तेवढ्यावरून त्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध होत नाही, असा निकाल गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिला आहे.

आसाममध्ये राबविण्याल्या ‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’ची (एनआरसी) अंतिम यादी गेल्या आॅगस्टमध्ये प्रसिद्ध झाली. त्यात नागरिकत्वाचे पुरावे अग्राह्य ठरलेल्या १९ लाखांहून अधिक नागरिकांची नावे वगळली गेली. आता हे लोक नागरिकत्व सिद्ध करून ‘एनपीआर’मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी त्या कायद्यानुसार स्थापन केलेल्या विशेष न्यायाधिकरणांकडे दाद मागत आहेत.अशा लोकांपैकीच असलेल्या जबेदा बिवी ऊर्फ जबेदा खातून नावाच्या महिलेने न्यायाधिकरणाकडे अर्ज केला होता. परंतु तो फेटाळून न्यायाधिकरणाने तिला ‘परकीय’ ठरविले. खरे तर ‘एनआरसी’ नोंदणीसाठी शेतसाऱ्याची पावती, पॅनकार्ड किंवा बँक खात्याचे स्टेटमेंट हे ग्राह्य पुरावे होते व तेच या महिलेने सादर केले होते. न्यायाधिकरणाच्या निकालाविरुद्ध जबेदा बेगमने केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. मनोजित भुयान व न्या. पार्थिवज्योती सैकिया यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निकाल दिला. खंडपीठाने यासाठी यात उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेतला. याच खंडपीठाने काही दिवसांपूर्वी दुसºया एका प्रकरणात मतदार ओळखपत्र हाही नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचा निकाल दिला होता. आसाममध्ये ‘एनपीआर’वरून व त्यातही लाखो हिंदूंची नावे वगळली जाण्यावरून प्रचंड असंतोष आहे. नावे वगळलेले लोक अनिश्चित भविश्याच्या चिंतेने ग्रस्त आहेत. (वृत्तसंस्था)नागरिकत्वच अडचणीतदेशभर एनआरसी राबविण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यानंतर अनेक ठिकाणी त्याविरोधात आंदोलने सुरू झाली.आजही ती सुरू आहेत. अशा स्थितीत एनआरसी राबविली गेली आणि वरील कागदपत्रांखेरीज अन्य पुरावे लोकांकडे नसल्यास त्यांच्या नागरिकत्वाचे काय होणार, हा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसीचा मुद्दाच नाही, असे सांगितले आहे, तर ती राबविण्यास काही राज्यांनी विरोध केला आहे.

टॅग्स :AssamआसामPan Cardपॅन कार्डcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक