शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

अण्णाद्रमुकमधील पलानीस्वामी-पनीरसेल्वम गट येणार एकत्र, सोमवारी घोषणेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 15:30 IST

मागच्या काही महीन्यांपासून अण्णाद्रमुकमध्ये सुरु असलेला संघर्ष संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देयेत्या सोमवारी अण्णाद्रमुकमधील हे दोन्ही गट एकत्र येण्याची घोषणा करु शकतात.केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून या दोन्ही गटांवर एकत्र येण्यासाठी मोठा दबाव होता. 

चेन्नई, दि. 19 - मागच्या काही महीन्यांपासून अण्णाद्रमुकमध्ये सुरु असलेला संघर्ष संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. ओ. पनीरसेल्वम यांचा गट विद्यमान मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्याबरोबर तडजोड करायला तयार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या सोमवारी अण्णाद्रमुकमधील हे दोन्ही गट एकत्र येण्याची घोषणा करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून या दोन्ही गटांवर एकत्र येण्यासाठी मोठा दबाव होता. 

अण्णाद्रमुकमधील दोन्ही गट आणि भाजपामधील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार येत्या सोमवारी हे दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा होऊ शकते. अमित शहा यांच्या तामिळनाडू दौ-याच्या एकदिवस आधी ही घोषणा होईल. काल दोन्ही गटातील नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या. शुक्रवारीच हे दोन्ही गट एकत्र आल्याची घोषणा होईल असे चित्र निर्माण झाले होते. मरीना बीचवरील जयललिता यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटाचे नेते, कार्यकर्ते मोठया संख्येने जमले होते. पण उशिरापर्यंत कुठलीही माहिती मिळत नसल्याने अखेर जमलेले कार्यकर्ते माघारी फिरले. 

येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल. पक्ष कार्यकर्त्यांचे हित डोळयासमोर ठेऊन निर्णय घेऊ असे पनीरसेल्वम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. व्ही.के.शशिकलाच्या कुटुंबाची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी आणि जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाचा सीबीआय तपास या पनीरसेल्वम गटाच्या दोन मुख्य मागण्या आहेत तसेच मुख्यमंत्री किंवा पक्षाचे सरचिटणीसपदी द्यावे ही पनीरसेल्वम गटाची तिसरी  मागणी आहे. पलानीस्वामी गटाकडून या तिन्ही मागण्यांवर कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने एकत्रीकरणाची घोषणा रखडली आहे. 

जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात शशिकला व ओ पन्नीरसेल्वम असे दोन गट पडले. त्यांनी अण्णाद्रमुकमधील आमदारांच्या मदतीने पक्षाचे सरचिटणीसपद मिळवले व मुख्यमंत्रीपदाची मोर्चेबांधणी केली होती. पण या दरम्यान त्यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे शशिकला यांना तुरुंगातून पलानीस्वामी यांचा शपथविधी पाहावा लागला. 

शशिकला तुरुंगात गेल्यानंतर पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी गट यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. पनीरसेल्वम गटाने शशिकला आणि तिच्या कुटुंबाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची अट टाकली. टीटीव्ही दिनकरन व त्यांच्या कुटुंबीयांना अण्णाद्रमुकपासून दूर ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यामुळे दोन गटांतील ऐक्याची प्रक्रिया सोपी झाली.