शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
3
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
4
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
5
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
6
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
7
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
8
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
9
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
10
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
11
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
12
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
13
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
15
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
16
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
17
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
18
"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
19
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
20
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'हे' असणार देशातलं शंभरावं विमानतळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 10:18 IST

देशांतर्गत वाहतुकीला चालना देण्यावर भर

नवी दिल्ली: लवकरच देशातील विमानतळांची संख्या शंभरवर जाणाराय. सिक्कीममधलं पाकयाँग विमानतळ जून महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. हे विमानतळ देशातलं शंभरावं विमानतळ ठरणाराय. स्पाईसजेट कंपनीला कोलकाता ते पाकयाँग दरम्यान विमान सेवा देण्याची परवानगी मिळालीय. सध्या देशातील सर्व राज्यांमध्ये विमानतळ आहे. मात्र सिक्कीम त्याला अपवाद आहे. 'जूनमध्ये पाकयाँग विमानतळ कार्यान्वित होईल. त्यामुळे सिक्कीम हवाई मार्गानं देशाशी जोडलं जाईल,' असं सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितलं. देशांतर्गत हवाई वाहतूकसेवेला चालना देण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जातोय. याच योजनेचा भाग म्हणून देशभरातील विमानतळांची संख्या पंचवीसनं वाढवली जाणाराय. मे/जून महिन्यापासून जमशेदपूर, दुर्गापूर, कुल्लू आणि पंतनगर इथून हवाई वाहतूक सुरू होईल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी ही माहिती दिलीय. याशिवाय 13 विमानतळांचं आधुनिकीकरण केलं जाणाराय. यामध्ये कानपूर, रौरकेला, बुर्नपूर, उत्केला, जेयपोरे या विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय 23 विमानतळांना हॅलिपॅड सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय. 

टॅग्स :AirportविमानतळIndiaभारत