शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 09:44 IST

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा कोणत्याही तिसऱ्या देशातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात आणि ट्रान्सशिपमेंटवर तात्काळ बंदी घातली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक आर्थिक आणि राजनैतिक पावले उचलली आहेत, यात व्यापार बंदीचा समावेश आहे.

आता पाकिस्तान युक्ती वापरून एखाद्या देशामार्फत भारतात माल पाठवण्याचा प्रयत्न करू शकतो, असं दिसत आहे. यामुळे आता भारत सरकारने पाकिस्तानशी संबंधित वस्तूंवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाने पाकिस्तानमधून येणार्‍या आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या तिसऱ्या देशांमधून भारतात पोहोचणाऱ्या वस्तूंवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले

२ मे रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात आणि वाहतुकीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली. यानंतर सीमाशुल्क विभागाने कडक देखरेख सुरू केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, अधिसूचना जारी होण्यापूर्वी समुद्री वाहतुकीत असलेले कंटेनर देखील आता बंदीच्या कक्षेत येतात, तर सामान्यतः अशा प्रकरणांमध्ये सूट दिली जाते.

संशय आल्यानंतर बंदरात माल थांबवला जातो

मिळालेल्या माहितीनुसार, जिथे जिथे संशय आहे तिथे सीमाशुल्क विभाग कारवाई करत आहे. डीआरआयने काही बंदरांवर कारवाई केली आहे. काही दिवसापूर्वीच पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजाला भारतात डॉक करण्याची परवानगी देण्यात आली नाही. व्यापाऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार केली आहे, परंतु सुरक्षा आणि नियमांसाठी ही कठोर कारवाई आवश्यक होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

पाकिस्तानातून युएई सारख्या तिसऱ्या देशांमधून येणाऱ्या वस्तू ओळखणे सोपे नाही कारण या वस्तू 'रूल ऑफ ओरिजिन सर्टिफिकेट' सोबत येतात. पण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लेबल्स आणि पॅकेजिंगची बारकाईने तपासणी केल्यास खरा स्रोत उघड होतो. पाकिस्तानी खजूर आणि सुकामेवा यूएईमार्गे भारतात येत असल्याचा संशय आहे आणि हा मुद्दा अमिराती सरकारसमोर उपस्थित करण्यात आला आहे. यूएईने उत्पादनाचे आकडे दिले आहेत. ते स्वतः खजूर आणि सुकामेवा देखील तयार करतात, असा दावा त्यांनी केला. 

२ मे च्या अधिसूचनेपूर्वीच, भारताने २४ एप्रिल रोजी अटारी येथील चेक पोस्ट बंद केले होते. यामुळे पाकिस्तानशी थेट व्यापार पूर्णपणे थांबला. GTRI नुसार, सुमारे १० अब्ज डॉलर्स किमतीचा भारतीय माल ट्रान्झिट हब मार्गांनी पाकिस्तानमध्ये पोहोचतो.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत