शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 09:44 IST

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा कोणत्याही तिसऱ्या देशातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात आणि ट्रान्सशिपमेंटवर तात्काळ बंदी घातली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक आर्थिक आणि राजनैतिक पावले उचलली आहेत, यात व्यापार बंदीचा समावेश आहे.

आता पाकिस्तान युक्ती वापरून एखाद्या देशामार्फत भारतात माल पाठवण्याचा प्रयत्न करू शकतो, असं दिसत आहे. यामुळे आता भारत सरकारने पाकिस्तानशी संबंधित वस्तूंवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाने पाकिस्तानमधून येणार्‍या आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या तिसऱ्या देशांमधून भारतात पोहोचणाऱ्या वस्तूंवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले

२ मे रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात आणि वाहतुकीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली. यानंतर सीमाशुल्क विभागाने कडक देखरेख सुरू केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, अधिसूचना जारी होण्यापूर्वी समुद्री वाहतुकीत असलेले कंटेनर देखील आता बंदीच्या कक्षेत येतात, तर सामान्यतः अशा प्रकरणांमध्ये सूट दिली जाते.

संशय आल्यानंतर बंदरात माल थांबवला जातो

मिळालेल्या माहितीनुसार, जिथे जिथे संशय आहे तिथे सीमाशुल्क विभाग कारवाई करत आहे. डीआरआयने काही बंदरांवर कारवाई केली आहे. काही दिवसापूर्वीच पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजाला भारतात डॉक करण्याची परवानगी देण्यात आली नाही. व्यापाऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार केली आहे, परंतु सुरक्षा आणि नियमांसाठी ही कठोर कारवाई आवश्यक होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

पाकिस्तानातून युएई सारख्या तिसऱ्या देशांमधून येणाऱ्या वस्तू ओळखणे सोपे नाही कारण या वस्तू 'रूल ऑफ ओरिजिन सर्टिफिकेट' सोबत येतात. पण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लेबल्स आणि पॅकेजिंगची बारकाईने तपासणी केल्यास खरा स्रोत उघड होतो. पाकिस्तानी खजूर आणि सुकामेवा यूएईमार्गे भारतात येत असल्याचा संशय आहे आणि हा मुद्दा अमिराती सरकारसमोर उपस्थित करण्यात आला आहे. यूएईने उत्पादनाचे आकडे दिले आहेत. ते स्वतः खजूर आणि सुकामेवा देखील तयार करतात, असा दावा त्यांनी केला. 

२ मे च्या अधिसूचनेपूर्वीच, भारताने २४ एप्रिल रोजी अटारी येथील चेक पोस्ट बंद केले होते. यामुळे पाकिस्तानशी थेट व्यापार पूर्णपणे थांबला. GTRI नुसार, सुमारे १० अब्ज डॉलर्स किमतीचा भारतीय माल ट्रान्झिट हब मार्गांनी पाकिस्तानमध्ये पोहोचतो.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत