शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

पाकचा 11 जवानांना मारल्याचा दावा खोटा - भारतीय लष्कर

By admin | Updated: November 17, 2016 09:38 IST

14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या 11 जवानांना मारल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्काराने केला आहे. भारतीय लष्कराने हा दावा फेटाळून लावला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 17 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताविरोधात अनेक खोटे दावे केले जात आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे, 14 नोव्हेंबर रोजी नियंत्रण रेषेवर भारताच्या 11 जवानांना मारल्याचा दावा पाकिस्तानी लष्काराने केला आहे.
 
मात्र, भारतीय जवान मारले गेल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत भारतीय लष्कराने हे वृत्त फेटाळून लावले आहे. '14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तसेच 14 नोव्हेंबर रोजी भारतीय जवान मारले गेल्याचा पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचा दावादेखील खोटा आहे', असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे.  
 
काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातले. यासंदर्भात बोलताना, 'नियंत्रण रेषेजवळ भारताने केलेल्या गोळीबारात ज्या दिवशी पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले, त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने जवळपास 11 भारतीय जवानांना मारले', असा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी बुधवारी केला.  
 
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या संघर्षात पाकिस्तानने जवळपास 40-44 भारतीय सैनिकांना मारल्याचेही राहील शरीफ म्हणाले आहेत. मात्र भारतीय लष्कर ही बाब स्वीकारण्यास नकार देत असून झालेले नुकसान स्वीकारण्याची हिंमत भारताने दाखवावी, असा कांगावादेखील राहील यांनी केला आहे.  तसेच 'आक्रमक कारवाईतून काहीही निष्पन्न होणार नाही', असा संदेशदेखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.