शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद, विचारविनिमयानंतरच निर्णय; पहलगाम हल्ल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूकमंत्री नायडू यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 08:55 IST

पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात २६ जण ठार झाल्यानंतर भारत व पाकमध्ये तणाव वाढत असतानाच पाकने मागील आठवड्यात भारतीय एअरलाईन्सना आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताला हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर उत्पन्न झालेल्या स्थितीचे आकलन करण्यात येत असून, संपूर्ण विचारविनिमयानंतरच कोणताही निर्णय घेतला जाणार आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी म्हटले आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात २६ जण ठार झाल्यानंतर भारत व पाकमध्ये तणाव वाढत असतानाच पाकने मागील आठवड्यात भारतीय एअरलाईन्सना आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक मंत्रालय एअरलाईन्सशी संबंधित मुद्द्यांचे मूल्यांकन करीत आहे. यात उच्च परिचालन खर्चामुळे विमानाच्या तिकिटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाक संबंध अधिकच चिघळू लागले आहेत.

१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी

एअरलाइनचा खर्च वाढतोय

मंत्री म्हणाले की, आम्ही स्थितीचे आकलन करीत आहोत व विमान कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे. प्रदीर्घ काळापर्यंत हवाई क्षेत्र बंद राहण्याची शक्यता व त्याच्या परिणामावर काम करण्यात येत आहे.

पाकचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे, विशेषत: उत्तर भारतीय शहरांतून उड्डाण घेणाऱ्या विमानांचा प्रवासाचा वेळ अनेक तासांनी वाढत आहे. यामुळे एअरलाईनचा परिचालन खर्च वाढत आहे.

तिकिटांबाबत विचार सुरू

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थिती पूर्णपणे समजून घ्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले. हवाई क्षेत्रावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी  तिकिटासंदर्भात कोणते दिशानिर्देश जारी करण्याची योजना आहे का, असे विचारले असता नायडू म्हणाले की, सर्व पैलूंवर विचार करण्यात येणार आहे.

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीवर विचार केला जाईल. विमानांचे तिकीट मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहेत, असे दिसले तर मंत्रालय या मुद्द्यात जरूर लक्ष घालणार आहे. सध्या सर्व मुद्द्यांवर विचार सुरू आहे. परंतु, सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.

विमान वाहतुकीचे विश्लेषण करणारी संस्था सिरियमच्या आकडेवारीनुसार, भारतीय एअरलाईन्सकडून विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी ६,००० पेक्षा जास्त विमाने सोडली जातात.

टॅग्स :airplaneविमान