शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद, विचारविनिमयानंतरच निर्णय; पहलगाम हल्ल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूकमंत्री नायडू यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 08:55 IST

पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात २६ जण ठार झाल्यानंतर भारत व पाकमध्ये तणाव वाढत असतानाच पाकने मागील आठवड्यात भारतीय एअरलाईन्सना आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताला हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर उत्पन्न झालेल्या स्थितीचे आकलन करण्यात येत असून, संपूर्ण विचारविनिमयानंतरच कोणताही निर्णय घेतला जाणार आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी म्हटले आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात २६ जण ठार झाल्यानंतर भारत व पाकमध्ये तणाव वाढत असतानाच पाकने मागील आठवड्यात भारतीय एअरलाईन्सना आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक मंत्रालय एअरलाईन्सशी संबंधित मुद्द्यांचे मूल्यांकन करीत आहे. यात उच्च परिचालन खर्चामुळे विमानाच्या तिकिटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाक संबंध अधिकच चिघळू लागले आहेत.

१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी

एअरलाइनचा खर्च वाढतोय

मंत्री म्हणाले की, आम्ही स्थितीचे आकलन करीत आहोत व विमान कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे. प्रदीर्घ काळापर्यंत हवाई क्षेत्र बंद राहण्याची शक्यता व त्याच्या परिणामावर काम करण्यात येत आहे.

पाकचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे, विशेषत: उत्तर भारतीय शहरांतून उड्डाण घेणाऱ्या विमानांचा प्रवासाचा वेळ अनेक तासांनी वाढत आहे. यामुळे एअरलाईनचा परिचालन खर्च वाढत आहे.

तिकिटांबाबत विचार सुरू

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थिती पूर्णपणे समजून घ्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले. हवाई क्षेत्रावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी  तिकिटासंदर्भात कोणते दिशानिर्देश जारी करण्याची योजना आहे का, असे विचारले असता नायडू म्हणाले की, सर्व पैलूंवर विचार करण्यात येणार आहे.

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीवर विचार केला जाईल. विमानांचे तिकीट मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहेत, असे दिसले तर मंत्रालय या मुद्द्यात जरूर लक्ष घालणार आहे. सध्या सर्व मुद्द्यांवर विचार सुरू आहे. परंतु, सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.

विमान वाहतुकीचे विश्लेषण करणारी संस्था सिरियमच्या आकडेवारीनुसार, भारतीय एअरलाईन्सकडून विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी ६,००० पेक्षा जास्त विमाने सोडली जातात.

टॅग्स :airplaneविमान