शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

पाकिस्तानी तरुण भारतात आला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:03 IST

‘आमच्या भागात वाडवडिलांचं घर पाहणं, तिथं काही दिवस राहणं याला नशीब लागतं म्हणतात. मला माझ्या आईसाठी ते करायचं होतं!’

एहसान अहमद त्याचं नाव. तो मूळचा पाकिस्तानी; पण गत ७-८ वर्षांपासून अमेरिकेत वॉशिंग्टनला राहतो. लाहोरपासून २०० किलोमीटरवर सारगोधा त्याचं गाव. त्याच्या आईचा जन्म पाकिस्तानात झाला असला, तरी तिचे आई-बाबा म्हणजे एहसानचं आजोळ भारतातल्या भागवानचं. गुरदारपूरजवळचं. तिची इच्छा होती, आई-बाबांचं गाव पाहावं; पण ते झालं नाही. एहसान सांगतो, ‘आमच्या भागात वाडवडिलांचं घर पाहणं, तिथं काही दिवस राहणं याला नशीब लागतं म्हणतात. मला माझ्या आईसाठी ते करायचं होतं!’ तिला व्हिसा मिळाला नाही, पण एहसानला आठ दिवसांचा व्हिसा मिळाला. तो १२ मार्चला अटारी सीमेवरून भारतात आला. गावी गेला. तिथं बुजुर्गांना भेटला. आजोबांच्या आठवणी सांगितल्या. काही लोक त्यांना ओळखणारे भेटले. त्यांनी आगतस्वागत केलं. १९ मार्चला तो परत पोहोचला अटारीवर, तर त्याला सांगण्यात आलं की, देशाच्या सीमा बंद झाल्या असून, तुला जाता येणार नाही. त्याचा व्हिसाही संपत होता. त्यानं भारत सरकारला ट्विट करत अडचण सांगितली; पण २२ मार्चला जनता कर्फ्यु होता आणि पुढे देशभर लॉकडाऊन झालं. विदेशींना क्वारंटाईन करून गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं. तिथंच एहसानचीही सोय केली. दुश्मन मुल्ख म्हणून ज्या देशाविषयी माहिती मिळाली, तेथे तो क्वारंटाईन झाला होता. तो सांगतो, तिथं मलेशियन, जर्मन लोकही होते.एहसान सांगतो, ‘भारत सरकार आमची उत्तम काळजी घेत होतं. खायची व राहायची सोय होती; पण मन बेचैन होतं. ज्या देशात यायचे स्वप्न लहानपणापासून पाहिलं, व्हिसा मिळावा म्हणून प्रयत्न केले, व्हिसा मिळाला तेव्हा आठ दिवस का होईना म्हणत आलो, किती आनंद झाला होता! व त्याच देशात अडकून पडायची वेळ आली!’ १६ एप्रिलला त्याला सरकारने कळवलं की, अटारीहून तुमची जायची सोय केली आहे, तुम्ही जाऊ शकता! एहसान पाकिस्तानात परतला आहे!