शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पाकिस्तानी तरुण भारतात आला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:03 IST

‘आमच्या भागात वाडवडिलांचं घर पाहणं, तिथं काही दिवस राहणं याला नशीब लागतं म्हणतात. मला माझ्या आईसाठी ते करायचं होतं!’

एहसान अहमद त्याचं नाव. तो मूळचा पाकिस्तानी; पण गत ७-८ वर्षांपासून अमेरिकेत वॉशिंग्टनला राहतो. लाहोरपासून २०० किलोमीटरवर सारगोधा त्याचं गाव. त्याच्या आईचा जन्म पाकिस्तानात झाला असला, तरी तिचे आई-बाबा म्हणजे एहसानचं आजोळ भारतातल्या भागवानचं. गुरदारपूरजवळचं. तिची इच्छा होती, आई-बाबांचं गाव पाहावं; पण ते झालं नाही. एहसान सांगतो, ‘आमच्या भागात वाडवडिलांचं घर पाहणं, तिथं काही दिवस राहणं याला नशीब लागतं म्हणतात. मला माझ्या आईसाठी ते करायचं होतं!’ तिला व्हिसा मिळाला नाही, पण एहसानला आठ दिवसांचा व्हिसा मिळाला. तो १२ मार्चला अटारी सीमेवरून भारतात आला. गावी गेला. तिथं बुजुर्गांना भेटला. आजोबांच्या आठवणी सांगितल्या. काही लोक त्यांना ओळखणारे भेटले. त्यांनी आगतस्वागत केलं. १९ मार्चला तो परत पोहोचला अटारीवर, तर त्याला सांगण्यात आलं की, देशाच्या सीमा बंद झाल्या असून, तुला जाता येणार नाही. त्याचा व्हिसाही संपत होता. त्यानं भारत सरकारला ट्विट करत अडचण सांगितली; पण २२ मार्चला जनता कर्फ्यु होता आणि पुढे देशभर लॉकडाऊन झालं. विदेशींना क्वारंटाईन करून गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं. तिथंच एहसानचीही सोय केली. दुश्मन मुल्ख म्हणून ज्या देशाविषयी माहिती मिळाली, तेथे तो क्वारंटाईन झाला होता. तो सांगतो, तिथं मलेशियन, जर्मन लोकही होते.एहसान सांगतो, ‘भारत सरकार आमची उत्तम काळजी घेत होतं. खायची व राहायची सोय होती; पण मन बेचैन होतं. ज्या देशात यायचे स्वप्न लहानपणापासून पाहिलं, व्हिसा मिळावा म्हणून प्रयत्न केले, व्हिसा मिळाला तेव्हा आठ दिवस का होईना म्हणत आलो, किती आनंद झाला होता! व त्याच देशात अडकून पडायची वेळ आली!’ १६ एप्रिलला त्याला सरकारने कळवलं की, अटारीहून तुमची जायची सोय केली आहे, तुम्ही जाऊ शकता! एहसान पाकिस्तानात परतला आहे!