शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 08:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाकिस्तानची केवळ धोरणात्मक कोंडी करून थांबणार नाही तर बालाकोटसारखा भीषण हल्ला करेल, याची पाकिस्तान सरकार आणि दहशतवाद्यांना भीती आहे. यातही अतिरेक्यांना अदृश्य हल्ल्याची भीती आहे.

चंद्रशेखर बर्वे लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाठलाग करून हिशेब चुकविण्याची घोषणा केल्यामुळे पाकिस्तानात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतला असला तरी जिवाच्या भीतीपोटी अस्वस्थ आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाकिस्तानची केवळ धोरणात्मक कोंडी करून थांबणार नाही तर बालाकोटसारखा भीषण हल्ला करेल, याची पाकिस्तान सरकार आणि दहशतवाद्यांना भीती आहे. यातही अतिरेक्यांना अदृश्य हल्ल्याची भीती आहे. याचे कारण असे की, मागील दीड-दोन वर्षात अननोन गनमॅन च्या हातून तब्बल २० ते २५ कुख्यात दहशतवाद्यांची हत्या झाली आहे. ही हत्या कुणी केली ? याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

ज्या दहशतवाद्यांची हत्या झाली आहे त्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह अनेक अतिरेकी संघटनेच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी आणि कुख्यात दहशतवादी हाफीज सईदचा उजवा हात समजला जाणारा अदनान अहमद मारला गेला आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचा निकटवर्तीय मौलाना रहीम उल्ला तारिक कराचीत मारला गेला. झिया उर रहमान उर्फ नदीम ऊर्फ अबू कतल ऊर्फ कतल सिंधी अगदी मागच्याच महिन्यात १५ मार्चला झेलममध्ये मारला गेला आहे.

अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या हल्ल्याचा दहशतवाद्यांनी मोठा धसका घेतला आहे.लष्कर-ए-तोयबाचा अबू कताल आणि जनातचा नेता मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांची अलीकडेच अशीच हत्या केली. पाकिस्तान सरकारने या हत्यांसाठी भारतावर आरोप केले आहे. 

कारवाईत अनेक अतिरेक्यांना टिपण्यात यश

लष्कर-ए-तोयबाचा ख्वाजा शाहिद याचा शिरच्छेद केलेला मृतदेह पीओकेमधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) आढळून आला होता. याच संघटनेचा प्रमुख कमांडर अक्रम गाझी आणि मौलाना रहीम उल्लाह तारिक हाही एका हल्ल्यात मरण पावला. कडव्या विचारधारेचा उपदेशक मौलाना शेर बहादूर, सुखदूल सिंग, रियाज अहमद ऊर्फ अबू कासिम, जमात-उद-दावाचे मदरसा नेटवर्क चालविणारा हाफिज सईदचा जवळचा सहकारी हुसेन अरैन मारला गेला आहे. जैश-ए-मोहम्मदचा लतीफ मारला गेला आहे. तो गुलिस्तान-ए-जौहर येथे मौलवी म्हणूनही काम करीत होता. कमांडर बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम, हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचा जवळचा आणि अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा आणि इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी गटाचा टॉप कमांडर म्हणून काम करणारा काश्मिरी दहशतवादी ऐजाज अहमद अहंगर याचीही अज्ञान बंदुकधाऱ्यांनी हत्या केली.

पंजाब पोलिसच्या इंटेलिजेंस मुख्यालयावर मे २०२१ मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग संधू ऊर्फ हरविंदर सिंग रिंडा याचे लाहोरमधील रुग्णालयात निधन झाले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याची शंका वर्तविली जात होती. एनआयएने १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. संधूचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाल्याचे वृत्त लाहोरमधील लष्करी रुग्णालयाने दिले होते. इंडियन एअरलाइन्सचे आयसी-८१४ विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी एक झहूर मिस्त्री कराचीमध्ये ठार झाला.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत