शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

काश्मीरच्या निर्णयावर पाक वृत्तपत्रांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 04:20 IST

भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबत भारत सरकारने सोमवारी घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटले असून, तेथील सर्वच वृत्तपत्रांनी या निमित्ताने मंगळवारी भारतावर टीका केली आहे. भारताने जबरदस्तीने आणि हुकूमशाही काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि एक विशिष्ट समाज नष्ट करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे, असे काही वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.‘डॉन’ या मोठ्या खपाच्या प्रमुख दैनिकाने भारत सरकार हिंदुत्तवादी विचारांचे असल्याचे म्हटले आहे. काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी काश्मीरबाबतची ३७0 व ३५ अ ही कलमे हटवण्यात आल्याची टीकाही त्यात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयांना काँग्रेस व डाव्या पक्षांचा विरोध आहे, असे नमूद करताना डाव्या पक्षांतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला डॉनने प्रसिद्धी दिली आहे.इस्राएलने ज्या प्रकारे एक विशिष्ट समुदाय देशातून संपविण्याचे कारस्थान आखले होते, तसेच भारत सरकारने काश्मीरबाबत चालविले असल्याची टीका ‘द नेशन’ वृत्तपत्राने केली आहे. काश्मीरचा जगाशी असलेला संपर्क तोडण्याचे प्रयत्न भारत सरकार करू पाहत असून, नियंत्रण रेषेवर प्रचंड तणाव निर्माण करण्याचा आणि त्यात पाकिस्तानला अडकावण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.भारत सरकारने हा निर्णय घेताना काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती या नेत्यांना डांबून ठेवले, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात लष्कर व सशस्त्र दले आणून संचारबंदीसदृश्य वातावरण निर्माण केले, लोकांत भीती निर्माण केली, असे द न्यूज या वेबसाइटच्या वृत्तात म्हटले आहे. भारताचा हा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या धोरणाविरुद्ध असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. भारतात सध्या अतिटोकाचे सरकार असून, त्याचे इरादे काय आहेत, हे उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया बिलावल भूट्टो यांनी व्यक्त केली आहे.द पॅट्रियट या वृत्तपत्राने महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा भारत आता मरण पावला असून, भविष्यात भारतात दडपशाहीनेच सारे निर्णय घेतले जातील, असे म्हटले आहे. काश्मीरमध्ये रक्तपात होईल, असे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370