शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काश्मीरच्या निर्णयावर पाक वृत्तपत्रांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 04:20 IST

भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरबाबत भारत सरकारने सोमवारी घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये उमटले असून, तेथील सर्वच वृत्तपत्रांनी या निमित्ताने मंगळवारी भारतावर टीका केली आहे. भारताने जबरदस्तीने आणि हुकूमशाही काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला आणि एक विशिष्ट समाज नष्ट करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे, असे काही वर्तमानपत्रांनी म्हटले आहे.‘डॉन’ या मोठ्या खपाच्या प्रमुख दैनिकाने भारत सरकार हिंदुत्तवादी विचारांचे असल्याचे म्हटले आहे. काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी काश्मीरबाबतची ३७0 व ३५ अ ही कलमे हटवण्यात आल्याची टीकाही त्यात करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयांना काँग्रेस व डाव्या पक्षांचा विरोध आहे, असे नमूद करताना डाव्या पक्षांतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला डॉनने प्रसिद्धी दिली आहे.इस्राएलने ज्या प्रकारे एक विशिष्ट समुदाय देशातून संपविण्याचे कारस्थान आखले होते, तसेच भारत सरकारने काश्मीरबाबत चालविले असल्याची टीका ‘द नेशन’ वृत्तपत्राने केली आहे. काश्मीरचा जगाशी असलेला संपर्क तोडण्याचे प्रयत्न भारत सरकार करू पाहत असून, नियंत्रण रेषेवर प्रचंड तणाव निर्माण करण्याचा आणि त्यात पाकिस्तानला अडकावण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे म्हटले आहे.भारत सरकारने हा निर्णय घेताना काश्मीरमधील ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती या नेत्यांना डांबून ठेवले, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात लष्कर व सशस्त्र दले आणून संचारबंदीसदृश्य वातावरण निर्माण केले, लोकांत भीती निर्माण केली, असे द न्यूज या वेबसाइटच्या वृत्तात म्हटले आहे. भारताचा हा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या धोरणाविरुद्ध असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. भारतात सध्या अतिटोकाचे सरकार असून, त्याचे इरादे काय आहेत, हे उघड झाले आहे, अशी प्रतिक्रिया बिलावल भूट्टो यांनी व्यक्त केली आहे.द पॅट्रियट या वृत्तपत्राने महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा भारत आता मरण पावला असून, भविष्यात भारतात दडपशाहीनेच सारे निर्णय घेतले जातील, असे म्हटले आहे. काश्मीरमध्ये रक्तपात होईल, असे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370