शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 06:35 IST

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांचा ठाम शब्दांत पुनरुच्चार; सिंधू जल करार स्थगित करण्याची अधिसूचना जारी करत भारताचा सज्जड इशारा   

नवी दिल्ली - भारताकडूनपाकिस्तानला पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही. तशी रणनीती केंद्र सरकार तयार करत आहे, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पाटील यांनी हे वक्तव्य केले.

सी. आर. पाटील म्हणाले की, सिंधू जल करार भारताने स्थगित केला असून, या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतातून पाकिस्तानला पाण्याचा एकही थेंब दिला जाणार नाही, यावर केंद्र सरकार ठाम आहे. १९६० साली भारत व पाकिस्तानने सिंधू जल करार केला होता. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला आहे. पाटील यांनी सांगितले की, सीमेपलीकडून सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानने दोन देशांतील कराराच्या अटींचा भंग केला आहे. त्यामुळे हा करार स्थगित करण्यात येत असल्याचे भारताने पाकिस्तानला कळविले आहे. 

आमचा काहीही संबंध नाही, पाकिस्तानने केले हात वरपहलगामच्या हल्ल्याशी आमच्या देशाचा काहीही संबंध नाही. यासंदर्भात भारत करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असा ठराव पाकिस्तानच्या संसदेत शुक्रवारी संमत करण्यात आला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत