शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 06:35 IST

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांचा ठाम शब्दांत पुनरुच्चार; सिंधू जल करार स्थगित करण्याची अधिसूचना जारी करत भारताचा सज्जड इशारा   

नवी दिल्ली - भारताकडूनपाकिस्तानला पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही. तशी रणनीती केंद्र सरकार तयार करत आहे, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पाटील यांनी हे वक्तव्य केले.

सी. आर. पाटील म्हणाले की, सिंधू जल करार भारताने स्थगित केला असून, या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतातून पाकिस्तानला पाण्याचा एकही थेंब दिला जाणार नाही, यावर केंद्र सरकार ठाम आहे. १९६० साली भारत व पाकिस्तानने सिंधू जल करार केला होता. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला आहे. पाटील यांनी सांगितले की, सीमेपलीकडून सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानने दोन देशांतील कराराच्या अटींचा भंग केला आहे. त्यामुळे हा करार स्थगित करण्यात येत असल्याचे भारताने पाकिस्तानला कळविले आहे. 

आमचा काहीही संबंध नाही, पाकिस्तानने केले हात वरपहलगामच्या हल्ल्याशी आमच्या देशाचा काहीही संबंध नाही. यासंदर्भात भारत करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असा ठराव पाकिस्तानच्या संसदेत शुक्रवारी संमत करण्यात आला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत