शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला PoK मधील अत्‍याचाराचे परिणाम भोगावे लागतील, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 15:50 IST

"जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल."

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरातील जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत आहे. याचे परिणाम त्याला भोगावे लागतील, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा मिळविण्यासंदर्भात संकेत देत, जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सर्वांगीण विकासाचे लक्ष्य "पीओकेमधील गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतरच" साध्य केले जाईल, असेही राजनाथ यांनी म्हटले आहे.

‘शौर्य दिवस’ कार्यक्रमाला गुरुवारी संबोधित करताना राजनाथ म्हणाले, ‘आपण जम्मू काश्मीर आणि लद्दाखमध्ये विकासाच्या यात्रेला नुकतीच सुरुवात केली आहे. आपण जेव्हा गिलगिट आणि बाल्टिस्तानपर्यंत पोहोचू तेव्हाच आपले लक्ष्य पूर्ण होईल.’ भारतीय हवाई दलाचे जवान 1947 मध्ये आजच्याच दिवशी श्रीनगरमध्ये पोहोचले होते. या घटनेच्या आठवणीनिमित्त ‘शौर्य दिवसा’चे आयोजन केले जाते.

‘दहशतवादाचा धर्म नाही’ -पाकिस्तानकडून पीओकेमधील लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करत राजनाथ म्हणाले, शेजारील देशाला ‘‘याचे परिणाम भोगावे लागतील’’. तसेच, ‘दहशतवाद्याला कुठलाही धर्म नसतो. केवळ भारताला निशाणा बनवणे, हाच दहशतवाद्यांचा एकमेव हेतू आहे, असेही राजनाथ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहairforceहवाईदलPakistanपाकिस्तानPOK - pak occupied kashmirपीओके