शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:37 IST

India Vs Pakistan: १९६० मध्ये भारत पाकिस्तानमध्ये सिंधू जल वाटप करार झाला होता. यासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. भाजपाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयुब खान यांनी कराचीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

सुमारे सहा दशकांपूर्वी भारत-पाकिस्तानमधून वाहणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्यावरून झालेल्या करारावर भारताने पाकिस्तानला गेल्याच महिन्यात नोटीस जारी केली आहे. सिंधू नदीच्या पाणीवाटप करारात बदल करण्याची मागणी भारताने केली आहे. सिंधू जल कराराचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे यात म्हटले आहे. 

१९६० मध्ये भारत पाकिस्तानमध्ये सिंधू जल वाटप करार झाला होता. यासाठी जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती. भाजपाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयुब खान यांनी कराचीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. या करारानुसार रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या पाण्यावर भारताचे नियंत्रण तर सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर पाकिस्तानचे नियंत्रण प्रस्थापित झाले होते. 

लोकसंख्येतील बदल, पर्यावरणीय समस्या आणि भारताचे उत्सर्जन लक्ष्य पूर्ण करण्यासाठी स्वच्छ ऊर्जेच्या विकासाला वेग देण्याची गरज भारताने या नोटीसमध्ये मांडली आहे. करारानंतर परिस्थिती खूप बदलली असून पाणी वाटपामध्ये हे आताच्या परिस्थितीनुसार बदल करणे गरजेचे आहे. याचबरोबर सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांबाबतही या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. दहशतवादामुळे या कराराच्या सुरळीत कामकाजात अडथळा येत असल्याचे भारताने म्हटले आहे, असे सरकारी सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला म्हटले आहे. 

30 ऑगस्टलाच पाकिस्तानला नोटीस बजावण्यात आली आहे. यावर पाकिस्तानकडून अद्याप काही उत्तर आलेले नाही. करार झाल्यापासून एकतर्फी करार सुरू आहे, असाही ठपका यामध्ये ठेवण्यात आला आहे. भारताने आधीच पाकिस्तानी मालावर बंदी घातलेली आहे. व्यापार बंद केलेला आहे. आता पाण्यामुळे पाकिस्तानचे मुसके आवळण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWaterपाणी