शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

पाकिस्तानची भारताला धमकी, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केला तर याद राखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:18 IST

जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आतापासूनच धमक्यांची भाषा सुरु केली आहे.

ठळक मुद्देकाश्मीरमधील सशस्त्र बंड मोडून काढण्यासाठी भारत काश्मीरमध्ये क्रूरता दाखवत आहे. हल्ल्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्याची आता पद्धतच रुढ झाली आहे.

श्रीनगर - जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई करेल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आतापासूनच धमक्यांची भाषा सुरु केली आहे. सुंजवां लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप भारतीय तपास यंत्रणांनी केला आहे. पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावताना भारताने तपासाशिवाय निष्कर्ष काढल्याचे म्हटले आहे. 

शनिवारी पहाटे जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये पाच जवान शहीद झाले. एका सैनिकाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दहा जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भारताने या हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे कि, हल्ल्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्याची आता पद्धतच रुढ झाली आहे. भारतीय अधिकारी बेजबाबदार आणि तथ्यहीन आरोप करत आहेत. 

काश्मीरमधील सशस्त्र बंड मोडून काढण्यासाठी भारत काश्मीरमध्ये क्रूरता दाखवत आहे. त्यावरुन लक्ष वळवण्यासाठी भारत असे आरोप करत आहे. भारताने नियंत्रण रेषा पार करुन काही आगळीक केली,  तर खपवून घेणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सुमदाय भारताला काश्मीरमध्ये मानवधिकाराचे उल्लंघन करण्यापासून रोखेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे.  

इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीदजम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यानंतर, तिथून पळ काढणारे दहशतवादी कॅम्पजवळच्याच इमारतीत लपले असून त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्कराने इमारतीला वेढा घातला असून ते दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण, श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जवानांचं काम आणखी कठीण झालंय. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक