शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पाकिस्तानची भारताला धमकी, पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केला तर याद राखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:18 IST

जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आतापासूनच धमक्यांची भाषा सुरु केली आहे.

ठळक मुद्देकाश्मीरमधील सशस्त्र बंड मोडून काढण्यासाठी भारत काश्मीरमध्ये क्रूरता दाखवत आहे. हल्ल्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्याची आता पद्धतच रुढ झाली आहे.

श्रीनगर - जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जोरदार प्रत्युत्तर देईल, सर्जिकल स्ट्राइकसारखी कारवाई करेल अशी भिती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानने आतापासूनच धमक्यांची भाषा सुरु केली आहे. सुंजवां लष्करी तळावर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप भारतीय तपास यंत्रणांनी केला आहे. पाकिस्तानने हे आरोप फेटाळून लावताना भारताने तपासाशिवाय निष्कर्ष काढल्याचे म्हटले आहे. 

शनिवारी पहाटे जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये पाच जवान शहीद झाले. एका सैनिकाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दहा जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भारताने या हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मद या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावताना म्हटले आहे कि, हल्ल्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्याची आता पद्धतच रुढ झाली आहे. भारतीय अधिकारी बेजबाबदार आणि तथ्यहीन आरोप करत आहेत. 

काश्मीरमधील सशस्त्र बंड मोडून काढण्यासाठी भारत काश्मीरमध्ये क्रूरता दाखवत आहे. त्यावरुन लक्ष वळवण्यासाठी भारत असे आरोप करत आहे. भारताने नियंत्रण रेषा पार करुन काही आगळीक केली,  तर खपवून घेणार नाही असे पाकिस्तानने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सुमदाय भारताला काश्मीरमध्ये मानवधिकाराचे उल्लंघन करण्यापासून रोखेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे.  

इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीदजम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यानंतर, तिथून पळ काढणारे दहशतवादी कॅम्पजवळच्याच इमारतीत लपले असून त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्कराने इमारतीला वेढा घातला असून ते दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण, श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जवानांचं काम आणखी कठीण झालंय. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक