शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

पाक नरमला...! शांततेची संधी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:30 IST

वाढला आंतरराष्ट्रीय दबाव; कडक कारवाईसाठी दिला सज्जड दम

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याच्या कारस्थानाचे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली आतापर्यंतची ‘भारताला जशास तसे उत्तर दिले जाईल’ ही भूमिका बाजूला सारून, दोन्ही देशांनी शांततेसाठी प्रयत्न करू, असे मवाळ धोरण स्वीकारले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही बाजूंनी शांततेचे आवाहन करतानाच, त्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे दिल्यास आपण नक्की कारवाई करू, असे आश्वासनही दिले आहे.

आतापर्यंत पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा अजिबात संबंध नाही, असाच दावा इम्रान खान करीत आले. भारतात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी या हल्ल्याचा फायदा करून घेतला जात असल्याची टीकाही त्यांनी केली होती. आता मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळेच इम्रान खान यांनी शांततेची भाषा सुरू केली आहे. भारताने हल्ला करू नये, यासाठीच इम्रान खान यांनी शांततेची भाषा सुरू केल्याचे दिसत आहे.

त्यातच पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकिस्तान बेचिराख करेल. तसे होऊ द्यायचे नसेल, तर आपल्याला आधी ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील, असे सांगत, तशी पाकिस्तानची तयारी आहे का? असा सवाल पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी विचारला आहे.

अर्थात, आता अणुयुद्धाची शक्यता नाही, असे तेही म्हणाले असले, तरी पाकिस्तानची भीती त्यातून स्पष्टपणे दिसू लागली आहे. पुलवामा हल्ल्यात पाकचा हात असल्याचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. दुसरीकडे अमेरिकेसह सर्वच देश पाकिस्तानवर (पान ९ वर)आरडीएक्स आणले कुठून याचा शोध सुरूपुलवामा हल्ल्यासाठी पाकिस्तानातूनच आरडीएक्स आणले होते, असे एनआयएच्या तपासातून आढळून आले आहे. कोणत्या मार्गाने काश्मीरमध्ये ते आणले, याचा शोध सुरू आहे. ज्या कारमध्ये आरडीएक्स ठेवण्यात आले होते, त्या कारचा मालक सज्जाद भट्ट आहे, हेही एनआयएने शोधून काढले आहे. तो फरार आहे. मात्र, पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा हल्ल्यात थेट सहभाग होता आणि त्यांनीच सुसाइड बॉम्बर आदिल दार याचे माथे भडकावले होते व त्याच्याबरोबरच आणखी पाच ते सहा अतिरेकी या कटात सहभागी होते, असेही तपासात आढळून आले आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खान