शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 20:49 IST

काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे.

नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. त्यातच काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे. आज देखील 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. मात्र भारतीय जवानांनी देखील त्यांच्या या नापाक कृत्याला चोख प्रतिउत्तर दिलं आहे. 

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्यानं पूँछमधील केजी सेक्टरमध्ये सकाळी 7 वाजता गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. तसेच खोट्या अफवा पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या इंटर- सर्विसेज पब्लिक रिलेशंस संस्थेने देखील पाकिस्तानच्या 3 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे कबुल केले आहे. परंतु या चकमकीत पाकिस्तानच्या सैनिकांकडून भारताचे 5 जवान शहीद झाल्याचा दावा केला. मात्र पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा भारतीय लष्कराने सांगितले. 

भारतीय लष्कराचे नॅार्दन कमांडचे प्रमुख ले. जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपासून पाकिस्तानाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु भारतीय लष्कर पूर्णपणे सर्तक असून घुसखोरीच्या प्रयत्नांना उधळून लावले आहे. तसेच पाकिस्तानचे नापाक कृत्याला कधीच यशस्वी होऊ देणार नाही अशी पाकिस्तानला तंबी देखील दिली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत