शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

पाकच्या तीन सैनिकांचा खात्मा; कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 20:49 IST

काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे.

नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. त्यातच काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन गोळीबार करत आहे. आज देखील 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. मात्र भारतीय जवानांनी देखील त्यांच्या या नापाक कृत्याला चोख प्रतिउत्तर दिलं आहे. 

भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानी सैन्यानं पूँछमधील केजी सेक्टरमध्ये सकाळी 7 वाजता गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत 3 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला. तसेच खोट्या अफवा पसरविणाऱ्या पाकिस्तानच्या इंटर- सर्विसेज पब्लिक रिलेशंस संस्थेने देखील पाकिस्तानच्या 3 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे कबुल केले आहे. परंतु या चकमकीत पाकिस्तानच्या सैनिकांकडून भारताचे 5 जवान शहीद झाल्याचा दावा केला. मात्र पाकिस्तानचा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा भारतीय लष्कराने सांगितले. 

भारतीय लष्कराचे नॅार्दन कमांडचे प्रमुख ले. जनरल रणबीर सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपासून पाकिस्तानाकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु भारतीय लष्कर पूर्णपणे सर्तक असून घुसखोरीच्या प्रयत्नांना उधळून लावले आहे. तसेच पाकिस्तानचे नापाक कृत्याला कधीच यशस्वी होऊ देणार नाही अशी पाकिस्तानला तंबी देखील दिली. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत