शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार थांबवण्याची गयावया करणारा ना'पाक' चेहरा, सीमारेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 09:13 IST

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत.

श्रीनगर : सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. रविवारी (20 मे) अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या सैन्याला भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) सडेतोड प्रत्युत्तर देताच, पूर्णतः घाबरुन गेलेल्या पाकिस्ताननं हल्ले थांबवण्याची गयावया केली होती. मात्र यानंतर काही वेळातच पाकिस्ताननं आपला नापाक चेहरा दाखवत आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पुन्हा अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. 

रविवारी (20 मे)रात्रीपासून आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमधील अरनिया सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सध्या गोळीबार सुरू असून बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी ग्रामस्थांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, परिसरातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

अरनिया क्षेत्रातील त्रेवा गावाला पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवस जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय नागरी वस्त्यांत शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताच्या सीमा सुरक्षा दलानं जोरदार हल्ल्यानं उत्तर देताच पाकिस्तान पार घाबरुन गेला आणि आमच्यावरील हल्ले थांबवा, अशी गयवया पाकिस्तानी रेंजर्सनं रविवारी सकाळी केली.  यानंतर बीएसएफनं सीमारेषेवर गोळीबार बंद केल्यानंतर 10.10 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार सुरू करण्यात आला. 

जम्मूतील सांबा सेक्टर परिसरातील बाबा चमिलियाल आणि नारायणपुरा परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. सध्या परिसरात पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले असून भारतीय जवानदेखील त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.  

गोळीबार थांबवा, पाकिस्तानची गयावया !

पाकिस्ताननं तीन दिवस चालवलेल्या गोळीबार व तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे सीमा भागातील काही भारतीय रहिवासी मरण पावले असून, अनेक जण जखमी झालेत. बीएसएफचे दोन जवानही शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (19 मे) काश्मीरच्या लेह येथे आलेले असतानाही पाकिस्तानच्या कागळ्या सुरूच होत्या. यानंतर बीएसएफ जवानांनी आक्रमक पवित्रा घेऊन पाकिस्तानला धडाच शिकवला. 

बीएसएफच्या जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानाची माहिती देणारी 19 सेकंद कालावधीची थर्मल इमेजरी फित जारी करण्यात आली आहे. यावर्षी पाकिस्तानकडून 700 हल्ले चढवण्यात आले असून त्यात 18 जवान शहीद झालेत तर 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान