शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोळीबार थांबवण्याची गयावया करणारा ना'पाक' चेहरा, सीमारेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 09:13 IST

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत.

श्रीनगर : सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. रविवारी (20 मे) अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या सैन्याला भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (बीएसएफ) सडेतोड प्रत्युत्तर देताच, पूर्णतः घाबरुन गेलेल्या पाकिस्ताननं हल्ले थांबवण्याची गयावया केली होती. मात्र यानंतर काही वेळातच पाकिस्ताननं आपला नापाक चेहरा दाखवत आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पुन्हा अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. 

रविवारी (20 मे)रात्रीपासून आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमधील अरनिया सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सध्या गोळीबार सुरू असून बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी ग्रामस्थांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, परिसरातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

अरनिया क्षेत्रातील त्रेवा गावाला पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवस जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भारतीय नागरी वस्त्यांत शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारताच्या सीमा सुरक्षा दलानं जोरदार हल्ल्यानं उत्तर देताच पाकिस्तान पार घाबरुन गेला आणि आमच्यावरील हल्ले थांबवा, अशी गयवया पाकिस्तानी रेंजर्सनं रविवारी सकाळी केली.  यानंतर बीएसएफनं सीमारेषेवर गोळीबार बंद केल्यानंतर 10.10 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार सुरू करण्यात आला. 

जम्मूतील सांबा सेक्टर परिसरातील बाबा चमिलियाल आणि नारायणपुरा परिसरात आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. सध्या परिसरात पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले असून भारतीय जवानदेखील त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.  

गोळीबार थांबवा, पाकिस्तानची गयावया !

पाकिस्ताननं तीन दिवस चालवलेल्या गोळीबार व तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे सीमा भागातील काही भारतीय रहिवासी मरण पावले असून, अनेक जण जखमी झालेत. बीएसएफचे दोन जवानही शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (19 मे) काश्मीरच्या लेह येथे आलेले असतानाही पाकिस्तानच्या कागळ्या सुरूच होत्या. यानंतर बीएसएफ जवानांनी आक्रमक पवित्रा घेऊन पाकिस्तानला धडाच शिकवला. 

बीएसएफच्या जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानच्या झालेल्या नुकसानाची माहिती देणारी 19 सेकंद कालावधीची थर्मल इमेजरी फित जारी करण्यात आली आहे. यावर्षी पाकिस्तानकडून 700 हल्ले चढवण्यात आले असून त्यात 18 जवान शहीद झालेत तर 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान