शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पाकने दिल्लीतील ५0 टक्के कर्मचारी कमी करावेत, भारताचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:26 IST

इस्लामाबादच्या भारतीय उचायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पाकिस्तानी यंत्रणांनी मध्यंतरी अपहरण केले होते

नवी दिल्ली : भारतात हेरगिरी आणि दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवल्याबद्दल पाकिस्तानला त्यांच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातील ५0 टक्के कर्मचारी सात दिवसांत कमी करण्याचे आदेश भारताने मंगळवारी दिले. भारतही आपल्या इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचारी ५0 टक्क्याने कमी करणार आहे.पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून वरील सूचना दिल्या. इस्लामाबादच्या भारतीय उचायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पाकिस्तानी यंत्रणांनी मध्यंतरी अपहरण केले होते आणि त्या दोघांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवले होते. त्याबद्दल भारताने कडक शब्दांत समज दिल्यानंतर पाकिस्तानने दोघांची सुटका केली, याचा उल्लेख आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.>व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याची टीकापाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याची टीकाही भारताने केली आहे. तसेच सीमेपलीकडून होणारा हिंसाचार आणि दहशतवाद्यांना केली जाणारी मदत याबद्दलही पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्या उचायुक्त कार्यालयातील कर्मचारी वर्ग ५0 टक्क्याने कमी करण्यास सांगितले असून, तसेच भारतही करणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.