शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

पाकनं दुटप्पी भूमिका सोडून 26/11च्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी- भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:54 IST

मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळेच 26/11 या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 166 लोकांची हत्या करणारे खुलेआम फिरत आहेत. या हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा देण्यासाठी पाकिस्ताननं भारताला मदत करण्याची गरज आहे.26/11च्या हल्ल्यातील मास्टर माइंड पाकिस्तानमध्ये मोकळा फिरत आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसून ठरवण्यात आली आणि तिकडूनच हल्लेखोरांना भारतात पाठवण्यात आलं. आम्ही पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा अपील करतो की, दुटप्पी भूमिका सोडून त्यांनी त्या हल्लेखोरांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, असंही परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300हून अधिक जण जखमी होते. दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला जिवंत पकडलं होतं आणि 21 नोव्हेंबर 2012ला त्याला फासावर चढवण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजस्थानमधल्या भिलवाडामधल्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता. आम्ही संधीच्या शोधात आहोत. 26/11चा दहशतवादी हल्ला भारत कधीही विसरणार नाही. आम्ही दहशतवाद्यांविरोधात अशी कारवाई केली आहे की, त्यांना काश्मीरमधून बाहेर पडताही येत नाही आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी