शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

पाकनं दुटप्पी भूमिका सोडून 26/11च्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी- भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:54 IST

मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळेच 26/11 या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 166 लोकांची हत्या करणारे खुलेआम फिरत आहेत. या हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा देण्यासाठी पाकिस्ताननं भारताला मदत करण्याची गरज आहे.26/11च्या हल्ल्यातील मास्टर माइंड पाकिस्तानमध्ये मोकळा फिरत आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसून ठरवण्यात आली आणि तिकडूनच हल्लेखोरांना भारतात पाठवण्यात आलं. आम्ही पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा अपील करतो की, दुटप्पी भूमिका सोडून त्यांनी त्या हल्लेखोरांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, असंही परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300हून अधिक जण जखमी होते. दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला जिवंत पकडलं होतं आणि 21 नोव्हेंबर 2012ला त्याला फासावर चढवण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजस्थानमधल्या भिलवाडामधल्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता. आम्ही संधीच्या शोधात आहोत. 26/11चा दहशतवादी हल्ला भारत कधीही विसरणार नाही. आम्ही दहशतवाद्यांविरोधात अशी कारवाई केली आहे की, त्यांना काश्मीरमधून बाहेर पडताही येत नाही आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी