शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

पाकनं दुटप्पी भूमिका सोडून 26/11च्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्यावी- भारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:54 IST

मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला आज 10 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेमुळेच 26/11 या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 166 लोकांची हत्या करणारे खुलेआम फिरत आहेत. या हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा देण्यासाठी पाकिस्ताननं भारताला मदत करण्याची गरज आहे.26/11च्या हल्ल्यातील मास्टर माइंड पाकिस्तानमध्ये मोकळा फिरत आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसून ठरवण्यात आली आणि तिकडूनच हल्लेखोरांना भारतात पाठवण्यात आलं. आम्ही पाकिस्तान सरकारला पुन्हा एकदा अपील करतो की, दुटप्पी भूमिका सोडून त्यांनी त्या हल्लेखोरांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, असंही परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबर 200८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये अधिकाऱ्यांसह शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता, तर 300हून अधिक जण जखमी होते. दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला जिवंत पकडलं होतं आणि 21 नोव्हेंबर 2012ला त्याला फासावर चढवण्यात आलं. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राजस्थानमधल्या भिलवाडामधल्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना पाकिस्तानवर हल्लाबोल केला होता. आम्ही संधीच्या शोधात आहोत. 26/11चा दहशतवादी हल्ला भारत कधीही विसरणार नाही. आम्ही दहशतवाद्यांविरोधात अशी कारवाई केली आहे की, त्यांना काश्मीरमधून बाहेर पडताही येत नाही आहे.

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी