शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 19:09 IST

Jammu-Kashmir Elections : पाकिस्तान मानवतेचा शत्रू आहे, तो मानवतेचा कर्करोग आहे. या कर्करोगापासून जगाची मुक्तता झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

Jammu-Kashmir Elections : श्रीनगर :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी २५ सप्टेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रामगडमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभा झाली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी खोऱ्यातील जनतेला मोठे आश्वासन दिले. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास पाकव्याप्त काश्मीर (पीओके) जम्मू-काश्मीरचा भाग होणार आहे. यामुळेच पाकिस्तानात खळबळ उडाली आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. 

एका बाजूला भारत आहे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. पाकिस्तानमध्ये अन्नधान्याची टंचाई आहे, साहजिकच गरीब पाकिस्तान आज स्वत:ला सांभाळू शकत नाही. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर त्यातून वेगळे होण्यासाठी आवाज उठवत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक म्हणत आहेत की, आम्हालाही जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार आहे. तर आमची केमिस्ट्री पाकिस्तानशी जुळत नाही, असे बलुचिस्तान सांगत आहे. कारण पाकिस्तान मानवतेचा शत्रू आहे, तो मानवतेचा कर्करोग आहे. या कर्करोगापासून जगाची मुक्तता झाली पाहिजे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

जाहीर सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, मला राहुल गांधींना विचारायचे आहे की जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र ध्वज देण्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सने जे म्हटले आहे, त्याचे ते समर्थन करतात का? कलम ३७० आणि ३५ ए परत आणण्याच्या आणि जम्मू-काश्मीरला अशांतता आणि दहशतवादाच्या युगात ढकलण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मागणीला राहुल गांधी समर्थन देतात का? काश्मीरमधील तरुणांच्या किंमतीवर पाकिस्तानशी बोलून पुन्हा फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचे काँग्रेस समर्थन करते का? असे सवाल करत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधलादुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, "आम्हाला भाजपकडून आणखी काही अपेक्षा नाही. नॅशनल कॉन्फरन्स हा असा पक्ष आहे, ज्याने गेल्या ३५ वर्षात हजारो बलिदान दिले आहे. जर आम्हाला पाकिस्तानच्या अजेंड्यानुसार जायचे होते, तर आम्ही ३५ वर्षांपूर्वी गेलो असतो, तर कदाचित आपल्या ४५०० हून अधिक साथीदारांचा बळी गेला नसता. जर अमित शाहांना नॅशनल कॉन्फरन्सच्या त्या बलिदानाकडे दुर्लक्ष करायचे असते, तर आम्ही काय करू शकतो?"

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा