शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आता नेव्हीचा स्ट्राइक?, भारताकडून अरबी समुद्रात युद्धनौका, पाणबुड्या अन् लढाऊ विमानं तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 10:47 IST

भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य आणि न्यूक्लिअर सबमरीन असलेल्या 60 युद्धनौका आणि 80 एअरक्राफ्ट तैनात केल्या आहेत.

नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलानं अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य आणि न्यूक्लिअर सबमरीन असलेल्या 60 युद्धनौका आणि 80 लढाऊ विमानं तैनात केली आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. नौदल हे पहिल्यापासूनच युद्धसराव करत आहे. परंतु 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर युद्धनौकांना अभ्यासाऐवजी बदल्याच्या कारवाईसाठी तैनात करण्यात आलं आहे.नौदलाच्या जवळपास 60 युद्धनौकांसह तटरक्षक दलाच्या 12 युद्धनौका आणि 80 लढाऊ विमानं सज्ज आहेत. नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डीके शर्मा म्हणाले, नौदल ट्रॉपिक्स अभ्यासात व्यक्त आहे. या अभ्यासामुळे पाकिस्तानकडून होत असलेल्या बारीकसारीक हालचाली टिपता येणार आहे. भारताच्या नौदलाची यंत्रणा सक्षम असल्यानं पाकिस्ताननं अजूनपर्यंत सीमा ओलांडलेल्या नाहीत.पाकिस्ताननं असं केल्यास आम्हाला त्याची तात्काळ माहिती मिळते, असंही शर्मा म्हणाले आहेत. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव विकोपाला गेला आहे. त्यानंतर भारतानंही बालाकोटमध्ये जैश-एम-मोहम्मदच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केली होती. पाकिस्ताननं या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तरादाखल भारतीय चौक्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक