शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 08:37 IST

India vs Pakistan War: पहलगाम हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्यानेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद पोसतोय, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांत भारताने ऐकवले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जगभरातून घेरण्याची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पहलगाम हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्यानेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तान गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद पोसतोय, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांत भारताने ऐकवले आहे.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तान एक दुष्ट देश असल्याचे म्हटले आहे.दहशतवादाचा बळी आणि वाचलेल्यांना सुरक्षित जागा प्रदान करण्याचे उद्दिष्ट असलेल्या व्हिक्टिम्स ऑफ टेररिझम ऑर्गनायझेशन नेटवर्क (VOTAN) च्या लाँचप्रसंगी त्या बोलत होत्या.  पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मुलाखतीदरम्यान दहशतवादाला पाठिंबा आणि निधी दिल्याची कबुली दिली आहे, हे जगाने पाहिले असल्याचे त्या म्हणाल्या. या उघड कबुलीजबाबाने कोणालाही आश्चर्य वाटले नाही. यावरून पाकिस्तानची प्रतिमा एक वाईट देश म्हणून स्पष्ट होते.जग आता डोळेझाक करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. 

भारताविरुद्ध प्रचार आणि निराधार आरोप पसरवण्यासाठी पाकिस्तानने जागतिक व्यासपीठाचा गैरवापर केल्याचाही आरोप त्यांनी केला. दहशतवादी कृत्ये गुन्हेगारी आणि अन्याय्य आहेत, त्यांचा हेतू काहीही असो.सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निःसंशयपणे निषेध केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा बळी आहे. अशा परिस्थितीत, भारत दहशतवादाच्या बळींना कधीही विसरणार नाही आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी म्हटले. 

वोटान ची स्थापना ही एक महत्त्वाची पायरी आहे जी दहशतवादाच्या बळींसाठी एक सुरक्षित स्थान निर्माण करेल. पीडितांना ऐकण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी एक संरचित, सुरक्षित जागा तयार होईल. दहशतवादा विरोधात जागतिक प्रतिसाद बळकट करण्यासाठी वोटनसारखे उपक्रम आवश्यक आहेत असे भारताचे मत आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघTerrorismदहशतवाद