शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 21:36 IST

Pakistan India Tension: पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत.

Pakistan India Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. भारत कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो, या भीतीच्या छायेत पाकिस्तान आहे. दरम्यान, आता या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने बुधवारी (30 एप्रिल 2025) गिलगिट आणि स्कार्दूला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. 

परदेशी उड्डाणांवर देखरेख वाढवलीमीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय हवाई सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर उत्तरेकडील भागांना जाणारी उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, परदेशी उड्डाणांवरही कडक देखरेख सुरू करण्यात आली. माहितीनुसार, पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाला (CAA) सर्व येणाऱ्या परदेशी विमानांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंदपाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र आधीच बंद केले आहे. या संदर्भात एअरमेनला नोटीस जारी करण्यात आली, ज्यामध्ये सुरुवातीला एका महिन्यासाठी भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी आकाशातून उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध भारतीय लष्करी आणि व्हीआयपी विमानांवर देखील लागू होतात.

दोन्ही देशातील तणाव शिगेला 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. 

दोन्ही देशांची एकमेकांवर कारवाईभारताने पाकविरोधात कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली. यामध्ये 1960 च्या सिंधू पाणी कराराचे तात्काळ निलंबन, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ निलंबित करणे अशा कारवायांचा समावेश आहे. भारताच्या या निर्णयांनंतर पाकिस्तानने शिमला करार रद्द करणे आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करणे, असे निर्णय घेतले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत