शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 21:36 IST

Pakistan India Tension: पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत.

Pakistan India Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. भारत कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो, या भीतीच्या छायेत पाकिस्तान आहे. दरम्यान, आता या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने बुधवारी (30 एप्रिल 2025) गिलगिट आणि स्कार्दूला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. 

परदेशी उड्डाणांवर देखरेख वाढवलीमीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय हवाई सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर उत्तरेकडील भागांना जाणारी उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, परदेशी उड्डाणांवरही कडक देखरेख सुरू करण्यात आली. माहितीनुसार, पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाला (CAA) सर्व येणाऱ्या परदेशी विमानांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंदपाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र आधीच बंद केले आहे. या संदर्भात एअरमेनला नोटीस जारी करण्यात आली, ज्यामध्ये सुरुवातीला एका महिन्यासाठी भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी आकाशातून उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध भारतीय लष्करी आणि व्हीआयपी विमानांवर देखील लागू होतात.

दोन्ही देशातील तणाव शिगेला 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. 

दोन्ही देशांची एकमेकांवर कारवाईभारताने पाकविरोधात कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली. यामध्ये 1960 च्या सिंधू पाणी कराराचे तात्काळ निलंबन, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ निलंबित करणे अशा कारवायांचा समावेश आहे. भारताच्या या निर्णयांनंतर पाकिस्तानने शिमला करार रद्द करणे आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करणे, असे निर्णय घेतले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत