शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:47 IST

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमधून पाकिस्तानवर जोरदार टीका केली.

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सातत्याने पाकिस्तानवर टीका करताना दिसत आहेत. अशातच, ओवेसी मंगळवारी(6 मे) काश्मीरमध्ये पोहोचले. यादरम्यान, त्यांनी पहलगाम हल्ल्यावर भाष्य केले अन् केंद्र सरकारने पाकिस्तानला सर्वात मोठी अद्दल घडवण्याची मागणीही केली. 

पाकिस्तानला धडा शिकवाहिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना ओवेसी म्हणाले, पहलगाममध्ये लोकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घालण्यात आल्या. या गुन्हेगारांना माणूस म्हणवून घेण्याचे अधिकार नाहीत. आम्ही सरकारला या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावामुळे आपल्याला कारवाई करण्याचा अधिकार मिळतो. पाकिस्तानी सैन्य दोन्ही देशांमधील संबंध बिघडवत आहे. वातावरण बिघडवणे ही पाकिस्तानी सैन्याची सवय आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत असे पाकिस्तानी लष्कराला वाटत नाही. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. भारताने अशी कारवाई करावी जेणेकरून कोणीही पुन्हा असे करू नये. उत्तर असे असले पाहिजे की, पाकिस्तानने 100 वेळा विचार करावा. 

तुर्कीने सीरियामध्ये जे केले...ओवेसी पुढे म्हणतात, यावेळी फक्त हल्ला करू नका, तिथे जाऊन बसा. भारताने पाकिस्तानच्या गैर-राज्य घटकांना शिक्षा करणे महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे तुर्कीने सीरियात घुसून राज्याबाहेरील घटकांवर हल्ला केला, त्याचप्रमाणे भारतानेही तेच करायला हवे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. पाकिस्तानमध्ये लष्कर इस्लामच्या नावाखाली लोकांना भडकावू शकत नाही. जर पाकिस्तान म्हणत असेल की, सिंधू पाणी कराराचे उल्लंघन करणे युद्ध आहे तर त्यांनी पहलगाममध्ये काय केले? आता भारत सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. मी सरकारच्या प्रत्येक निर्णयासोबत आहे. आता दहशतवाद थांबवायला हवा. आता पाकिस्तानने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान