शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

'उरी' हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आधीच हलवले दहशतवाद्यांचे तळ

By admin | Updated: October 1, 2016 13:18 IST

'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ ते १७ तळ आधीच सुरक्षित स्थळी हलवले होते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - जम्मू-काश्मीरमधील  'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ते १७ तळ सुरक्षित स्थळी हलवले होते, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.  ' भारताकडून जोरदार हल्ला होण्याची कुणकुण लागताच लष्कर व गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने 'लष्कर -ए-तोयबा', ' जैश -ए -मोहम्मद' आणि 'हिजबुल मुजाहिद्दीन'चे दहशतवादी सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. मनसेहरा व मुझफ्फराबाद येथून कार्यरत असलेले ४ दहशतवादी तळही हलवण्यात आल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. 
(कमांडोनी चार तासात सात अतिरेकी तळ केले उद्ध्वस्त)
(भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?)
(उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच)
(उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यास पाकिस्तानी कलाकारांनी दिला नकार - सुभाषचंद्र गोयल)
  •  
 १८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर कारवाईच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक तळ रिकामे करत सुमारे ३०० दहशतवाद्यांनी पळ काढला. दहशतवाद्यांचे डझनभर तळ नौशेरा व झेलम या भागात तर काही तळ स्थानिक वस्तीत हलवण्यात आल्याचे समजते. 
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून  38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.