शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

"एस जयशंकर यांनी स्वतःच सांगितले की..."; भारतासोबतच्या संबंधावर पाकिस्ताने मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:21 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेसाठी पाकिस्तानात जाणार आहेत.

S Jaishankar Pakistan Visit: आगामी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतासोबत द्विपक्षीय चर्चेची शक्यता पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या परिषदेच्या भेटीदरम्यान भारतासोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे पाकिस्तानने मंगळवारी स्पष्ट केले. या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचे एक शिष्टमंडळ इस्लामाबादला जाणार आहेत. 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार असल्याची गेल्या आठवड्यात घोषणा करण्यात आली. या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या पाकिस्तान भेटीसंदर्भात एक मोठे विधान केले आमचा आगामी पाकिस्तान दौरा द्विपक्षीय चर्चेसाठी नसून बहुपक्षीय कार्यक्रमासाठी असेल. यावेळी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या मुद्द्यावर बोलणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेसुद्धा याबाबत भाष्य करत अशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचे म्हटलं आहे.

एस जयशंकर यांच्या भेटीबद्दल विचारले असता, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी ५ ऑक्टोबर रोजी केलेले विधान  तुम्ही लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे, ज्यात त्यांनी सांगितले की, त्यांचा आगामी इस्लामाबाद दौरा एका बहुपक्षीय कार्यक्रमासाठी आहे. पाकिस्तान-भारत संबंधांवर चर्चा करण्यासाठी नाही. त्यांचे हे विधान स्वतःच संकेत देत आहे," असे मुमताज झहरा बलोच म्हणाल्या.

दरम्यान, परराष्ट्र मंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात होती कारण नऊ वर्षांनी भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात जाणार होते. याआधी सुषमा स्वराज यांनी २०१५ मध्ये परराष्ट्र मंत्री असताना इस्लामाबादला भेट दिली होती. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेश कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट बैठकीसाठी ऑगस्टच्या सुरुवातीला भारताला पाकिस्तानकडून निमंत्रण मिळाले होते. यापूर्वी मे २०२३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात याच बैठकीसाठी भारत दौऱ्यावर आले होते.

भारत आणि पाकिस्तानमधील सर्व पातळीवरील संबंध सर्वात खालच्या स्तरावर आहेत. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर इस्लामाबादने नवी दिल्लीशी राजनैतिक संबंध कमी केले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हल्ला केल्यानंतर संबंध आधीच ताणले गेले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानS. Jaishankarएस. जयशंकर