शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील शस्त्रसंधीचं उल्लंघन बंद करा, सुषमा स्वराज यांना पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 12:39 IST

- पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा भारतावर आरोप करत ते थांबविण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा भारतावर आरोप करत ते थांबविण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात सुषमा स्वराज यांना हे पत्र मिळालं आहे. 

दोन्ही देशांकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन बंद करण्याची आता वेळ आली आहे. कारण यामध्ये निर्दोष लोकांचा बळी जातो, असं ख्वाजा आसिफ यांनी पत्रात म्हंटलं आहे. भारतीय जवाल सुरूवातीला गोळीबार करून उकसविण्याचा प्रयत्न करतात. त्या गोळीबाराला पाकिस्तानकडून उत्तर दिलं जातं, असाही आरोपही ख्वाजा आसिफ यांनी पत्रातून केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अजून या पत्राचं पाकिस्तानला कुठलंही उत्तर दिलेलं नाही. मंत्रालयातील सुत्रांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून करण्यात आलेला हा आरोप स्विकारण्याजोगा अजिबात नाही. 2017मधील सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात वाढ झाली आहे. 

गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पाकिस्ताने इंटरनॅशनल बॉर्डर आणि एलओसीवर 724 वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. गेल्यावर्षी हा आकडा 449 होता. ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात 12 नागरिक आणि 17 भारतीय जवानांचा मृत्यू झाला. 

हेरगिरीचा आरोप असलेले कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरूगांत आहेत. कुलभूषण जाधव यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात जाणार आहे. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण खात्री पाकिस्तानने द्यावी, अशी भारताची मागणी आहे. पाकिस्तानकडून नुकतीच कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. पण जाधव यांच्या आईलाही त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी,अशी भारताची इच्छा आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या पत्रात जाधव प्रकरणाचा उल्लेख केला नसल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील भारतीय दूतावासाला समन्स दिला जातो आहे. भारताकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे क्षेत्रीय शांती आणि सुरक्षेचं नुकसान होऊ शकतं, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. सुषमा स्वराज यांना पाठविलेल्या पत्रात आसिफ यांनी उलट भारतावरच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. भारतीय जवानांनी यावर्षी 1300 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं ज्यामध्ये 52 नागरिकांचा मृत्यू झाला, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.   

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज