शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

सीमेवरील शस्त्रसंधीचं उल्लंघन बंद करा, सुषमा स्वराज यांना पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 12:39 IST

- पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा भारतावर आरोप करत ते थांबविण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र लिहिलं आहे. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा भारतावर आरोप करत ते थांबविण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात सुषमा स्वराज यांना हे पत्र मिळालं आहे. 

दोन्ही देशांकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन बंद करण्याची आता वेळ आली आहे. कारण यामध्ये निर्दोष लोकांचा बळी जातो, असं ख्वाजा आसिफ यांनी पत्रात म्हंटलं आहे. भारतीय जवाल सुरूवातीला गोळीबार करून उकसविण्याचा प्रयत्न करतात. त्या गोळीबाराला पाकिस्तानकडून उत्तर दिलं जातं, असाही आरोपही ख्वाजा आसिफ यांनी पत्रातून केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अजून या पत्राचं पाकिस्तानला कुठलंही उत्तर दिलेलं नाही. मंत्रालयातील सुत्रांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून करण्यात आलेला हा आरोप स्विकारण्याजोगा अजिबात नाही. 2017मधील सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात वाढ झाली आहे. 

गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत पाकिस्ताने इंटरनॅशनल बॉर्डर आणि एलओसीवर 724 वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. गेल्यावर्षी हा आकडा 449 होता. ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात 12 नागरिक आणि 17 भारतीय जवानांचा मृत्यू झाला. 

हेरगिरीचा आरोप असलेले कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरूगांत आहेत. कुलभूषण जाधव यांची पत्नी त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानात जाणार आहे. त्यांच्या सुरक्षेची पूर्ण खात्री पाकिस्तानने द्यावी, अशी भारताची मागणी आहे. पाकिस्तानकडून नुकतीच कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला त्यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. पण जाधव यांच्या आईलाही त्यांना भेटण्याची परवानगी मिळावी,अशी भारताची इच्छा आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या पत्रात जाधव प्रकरणाचा उल्लेख केला नसल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून इस्लामाबादमधील भारतीय दूतावासाला समन्स दिला जातो आहे. भारताकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे क्षेत्रीय शांती आणि सुरक्षेचं नुकसान होऊ शकतं, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. सुषमा स्वराज यांना पाठविलेल्या पत्रात आसिफ यांनी उलट भारतावरच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. भारतीय जवानांनी यावर्षी 1300 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं ज्यामध्ये 52 नागरिकांचा मृत्यू झाला, असा आरोप पाकिस्तानने केला आहे.   

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज