शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:49 IST

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत.

चंदीगड - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रकरणी पाकिस्तान एकटा पडल्याने पाक सैरभैर झाला आहे. त्यामुळे भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी पाकिस्तान नापाक कुरापती करत असल्याचं समोर येत आहे. 

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे सीमेवरील अनेक गावांमध्ये आजाराने थैमान घातलं आहे. पाकिस्तानकडून अचानक जास्तीचं पाणी सोडल्यामुळे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज नदी भारतात येण्यापूर्वी पंजाबच्या काही भागातून पाकिस्तानात जाते. त्यानंतर पुन्हा भारतात प्रवेश करते. पाकिस्तानने या सतलुज नदीत प्रदुषित पाणी सोडण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे हजारो भारतीय शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आणि आरोग्याची हानी होत आहे. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी सतलुज नदीतील पाण्याची पातळी वाढल्याबद्दल परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी लष्करासोबत बैठक घेऊन नदीवरील तटबंध मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. फिरोजपूर जिल्ह्यातील गावांना दूषित पाण्याचा फटका बसला आहे. जीवघेणे आजारांनी गावकऱ्यांना त्रस्त केलं आहे. 

सीएम अमरिंदर सिंग यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. त्याचसोबत फिरोजपूर येथे एनडीआरएफ टीमला तैनात राहण्यास सांगितले आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टरांचे पथकही पूरग्रस्त भागात आहे. 

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला जगभरातील कोणत्याही देशाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने पाकचा थयथयाट समोर येऊ लागला आहे. अथक प्रयत्नानंतरही चीन, तुर्कीसारखे देशही पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने हताश झालेला पाकने धर्माच्या नावावर जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला आहे. तसेच समझौता एक्सप्रेसही रद्द केली आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारताला नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPunjabपंजाब