शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:49 IST

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत.

चंदीगड - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रकरणी पाकिस्तान एकटा पडल्याने पाक सैरभैर झाला आहे. त्यामुळे भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी पाकिस्तान नापाक कुरापती करत असल्याचं समोर येत आहे. 

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे सीमेवरील अनेक गावांमध्ये आजाराने थैमान घातलं आहे. पाकिस्तानकडून अचानक जास्तीचं पाणी सोडल्यामुळे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज नदी भारतात येण्यापूर्वी पंजाबच्या काही भागातून पाकिस्तानात जाते. त्यानंतर पुन्हा भारतात प्रवेश करते. पाकिस्तानने या सतलुज नदीत प्रदुषित पाणी सोडण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे हजारो भारतीय शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आणि आरोग्याची हानी होत आहे. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी सतलुज नदीतील पाण्याची पातळी वाढल्याबद्दल परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी लष्करासोबत बैठक घेऊन नदीवरील तटबंध मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. फिरोजपूर जिल्ह्यातील गावांना दूषित पाण्याचा फटका बसला आहे. जीवघेणे आजारांनी गावकऱ्यांना त्रस्त केलं आहे. 

सीएम अमरिंदर सिंग यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. त्याचसोबत फिरोजपूर येथे एनडीआरएफ टीमला तैनात राहण्यास सांगितले आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टरांचे पथकही पूरग्रस्त भागात आहे. 

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला जगभरातील कोणत्याही देशाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने पाकचा थयथयाट समोर येऊ लागला आहे. अथक प्रयत्नानंतरही चीन, तुर्कीसारखे देशही पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने हताश झालेला पाकने धर्माच्या नावावर जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला आहे. तसेच समझौता एक्सप्रेसही रद्द केली आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारताला नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPunjabपंजाब