शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 16:49 IST

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत.

चंदीगड - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रकरणी पाकिस्तान एकटा पडल्याने पाक सैरभैर झाला आहे. त्यामुळे भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी पाकिस्तान नापाक कुरापती करत असल्याचं समोर येत आहे. 

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे सीमेवरील अनेक गावांमध्ये आजाराने थैमान घातलं आहे. पाकिस्तानकडून अचानक जास्तीचं पाणी सोडल्यामुळे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज नदी भारतात येण्यापूर्वी पंजाबच्या काही भागातून पाकिस्तानात जाते. त्यानंतर पुन्हा भारतात प्रवेश करते. पाकिस्तानने या सतलुज नदीत प्रदुषित पाणी सोडण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे हजारो भारतीय शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आणि आरोग्याची हानी होत आहे. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी सतलुज नदीतील पाण्याची पातळी वाढल्याबद्दल परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी लष्करासोबत बैठक घेऊन नदीवरील तटबंध मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. फिरोजपूर जिल्ह्यातील गावांना दूषित पाण्याचा फटका बसला आहे. जीवघेणे आजारांनी गावकऱ्यांना त्रस्त केलं आहे. 

सीएम अमरिंदर सिंग यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. त्याचसोबत फिरोजपूर येथे एनडीआरएफ टीमला तैनात राहण्यास सांगितले आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टरांचे पथकही पूरग्रस्त भागात आहे. 

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला जगभरातील कोणत्याही देशाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने पाकचा थयथयाट समोर येऊ लागला आहे. अथक प्रयत्नानंतरही चीन, तुर्कीसारखे देशही पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने हताश झालेला पाकने धर्माच्या नावावर जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला आहे. तसेच समझौता एक्सप्रेसही रद्द केली आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारताला नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPunjabपंजाब