शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुरापती पाकिस्तानकडून सीमारेषेवर तोफगोळ्यांचा मारा, आजही शाळा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 09:35 IST

जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार हल्ला करण्यात येत आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार हल्ला करण्यात येत आहे. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी (22 मे) रात्रीदेखील पाकिस्ताननं कथुआ जिल्ह्यातील आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं बीएसएफच्या जवळपास 40 चौक्यांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. 

दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हीरानगर सेक्टरमधील लोंदी गाव व अरनिया सेक्टरमधील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व सरकारी तसंच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

 

 

  

दरम्यान,  पाकिस्ताननं अरनिया सेक्टरमध्ये सोमवारी (21मे) रात्रभर उफळी तोफांचा मारासुद्धा केला. या हल्ल्यात आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.  रविवारपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता. अरनियातील त्रेवा गावाला पाकिस्तानी रेंजर्सनी लक्ष्य केले. तिथे सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. रविवारी (20 मे) पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार थांबवा, अशी गयावया केल्यानंतर बीएसएफने सीमारेषेवर गोळीबार हल्ले थांबवले. पण त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानाने आपला खरा चेहरा दाखवला व प्रामुख्याने भारतातील नागरी वस्त्या व गावांवर हल्ले सुरू केले. पाकिस्तानने रविवारी जम्मूतील सांबा सेक्टरच्या बाबा चमिलियाल तसेच नारायणपुरा भागातून जाणा-या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ गोळीबार केला.  

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndian Armyभारतीय जवान