शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 07:22 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा

मेंढर : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पाकिस्तान घाबरताे. त्यामुळेच जम्मू-काश्मीर सीमेवर शांतता आहे. भारत ताेडीस ताेड प्रत्युत्तर देईल, हे जाणून असल्यामुळेच पाकिस्तान गाेळीबार करण्यास धजावणार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठी शाह यांनी मेंढर, थानामंडी, राजाैरी, पुंछ आणि अखनूर येथे प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी पाक पुरस्कृत दहशतवादावर टीकास्त्र साेडताना सांगितले की, केंद्र सरकारने तरुणांच्या हातात बंदुका-दगडांऐवजी लॅपटाॅप देत दहशतवादाचा बिमाेड केला. सरकार जम्मूच्या पर्वतरांगांमध्ये बंदुकांचा आवाज येऊ देणार नाही. लाेकांच्या सुरक्षेसाठी सीमेजवळ आणखी बंकर बनवू. मी १९९० च्या दशकात सीमेपलीकडून हाेणाऱ्या गाेळीबाराची आठवण करून देऊ इच्छिताे.

देशाला त्यांचा अभिमान...

शाह म्हणाले की, १९४७ मध्ये देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या गुज्जर आणि बक्करवाल समुदायावर देशाला अभिमान आहे. दहशतवाद फाेफावला त्यावेळी यांनीच शत्रूच्या गाेळ्या छातीवर झेलल्या. पहाडी, गुज्जर आणि बक्करवाल समुदायांना केवळ नाेकरीतच नव्हे तर पदाेन्नतीमध्येही आरक्षण देण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे, असे शाह यावेळी म्हणाले.

‘फारुख यांनीच दहशतवाद आणला’

शाह यांनी नॅशनल काॅन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेस या तीन पक्षांवर काश्मीरमध्ये दहशतवाद वाढण्यासाठी दाेषी ठरविले.

९० च्या दशकात फारुख यांच्याच आशीर्वादाने दहशतवाद फाेफावला. त्यावेळी प्रचंड गाेळीबार व्हायचा.

९० च्या दशकापासून २०१४ पर्यंत तिन्ही घराण्यांनी दहशतवाद पसरविला. त्यात ४० हजार तरुणांचा मृत्यू झाला, असा आराेप त्यांनी केला.

तोवर चर्चा नाहीच...

पूर्वीचे शासक पाकिस्तानला घाबरत हाेते. मात्र, आज पाकिस्तान माेदींना घाबरताे. ताे गाेळीबार करण्याची हिम्मत करणार नाही, असे शाह म्हणाले. दहशतवाद थांबविणार नाही, ताेपर्यंत पाकिस्तानसाेबत काेणतीही चर्चा हाेणार नाही, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान