शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

भारताच्या सीमेवर पाकचं F16 लढाऊ विमान, सुखोई अन् मिराजनं लावलं पळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 21:37 IST

भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत आहेत.

नवी दिल्ली-  भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत आहेत. भारतीय हवाई दलानंपाकिस्तानमधले दहशतवादी कॅम्प नष्ट केल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आतापर्यंत भारतानं पाकिस्तानच्या सर्वच नापाक योजना हाणून पाडल्या आहेत.सोमवारीही पाकिस्तानचे एफ 16 हे लढाऊ विमान पंजाब सीमेजवळ घिरट्या घालत असताना दिसलं. एएनआयच्या माहितीनुसार, पंजाब सीमेजवळ भारतीय रडारनं चार पाकिस्तानी एफ 16 विमानं आणि एक मोठ्या आकाराच्या यूएव्हीला पकडलं. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज या विमानांनी उड्डाण घेतलं. भारतीय लढाऊ विमानं येत असल्याचं पाहताच पाकिस्तानची लढाऊ विमानं पाकच्या हद्दीत परतली. ही घटना एक एप्रिलला पहाटे 3 वाजता घडली.  पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. 26 फेब्रुवारीला भारताच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारीला सकाळी पाकिस्ताननं एफ 16 आणि जेएफ 17 ही लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान भारताच्या मिग 21 या लढाऊ विमानानं पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाला खाली पाडलं. त्यानंतर मिग 21 विमानही दुर्घटनाग्रस्त झालं. भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमानलाही पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घेतलं होतं. परंतु भारतानं दबाव वाढल्यानंतर त्याला पाकिस्ताननं सोडलं होतं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल