शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

भारताच्या सीमेवर पाकचं F16 लढाऊ विमान, सुखोई अन् मिराजनं लावलं पळवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 21:37 IST

भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत आहेत.

नवी दिल्ली-  भारतानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं वारंवार भारतीय नियंत्रण रेषेवर घिरट्या घालत आहेत. भारतीय हवाई दलानंपाकिस्तानमधले दहशतवादी कॅम्प नष्ट केल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमानं भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आतापर्यंत भारतानं पाकिस्तानच्या सर्वच नापाक योजना हाणून पाडल्या आहेत.सोमवारीही पाकिस्तानचे एफ 16 हे लढाऊ विमान पंजाब सीमेजवळ घिरट्या घालत असताना दिसलं. एएनआयच्या माहितीनुसार, पंजाब सीमेजवळ भारतीय रडारनं चार पाकिस्तानी एफ 16 विमानं आणि एक मोठ्या आकाराच्या यूएव्हीला पकडलं. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि मिराज या विमानांनी उड्डाण घेतलं. भारतीय लढाऊ विमानं येत असल्याचं पाहताच पाकिस्तानची लढाऊ विमानं पाकच्या हद्दीत परतली. ही घटना एक एप्रिलला पहाटे 3 वाजता घडली.  पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त केले होते. 26 फेब्रुवारीला भारताच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले होते. त्यानंतर 27 फेब्रुवारीला सकाळी पाकिस्ताननं एफ 16 आणि जेएफ 17 ही लढाऊ विमानं भारताच्या हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान भारताच्या मिग 21 या लढाऊ विमानानं पाकिस्तानच्या एफ 16 या लढाऊ विमानाला खाली पाडलं. त्यानंतर मिग 21 विमानही दुर्घटनाग्रस्त झालं. भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमानलाही पाकिस्ताननं आपल्या ताब्यात घेतलं होतं. परंतु भारतानं दबाव वाढल्यानंतर त्याला पाकिस्ताननं सोडलं होतं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दल