शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Pakistan Election Results: इम्रान खान यांचं 'तालिबान खान' व्हर्जन भारतासाठी धोक्याचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 11:45 IST

Pakistan Election Results: पाकिस्तान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, इम्रान खान यांनी केलेली भाषणं ऐकल्यास त्यांच्या भारताबद्दलच्या भूमिकेचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो.

नवी दिल्लीः पाकिस्तान क्रिकेट संघाला 'अच्छे दिन' दाखवणारा माजी क्रिकेटपटू इम्रान खान आता या देशाचा पंतप्रधान होण्याच्या दिशेनं कूच करतोय. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी जसजशी पुढे सरकतेय, तसतसा इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष वरचढ होत चाललाय. पाकिस्तानात पीटीआयची सत्ता येणं, इम्रान खान यांनी पंतप्रधान होणं हे भारतासाठी तापदायक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. विशेषतः इम्रान खान यांची 'तालिबान खान' ही प्रतिमा पाहता, येत्या काळात भारताची डोकेदुखी वाढू शकते, असं बोललं जातंय. 

पाकिस्तान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, इम्रान खान यांनी केलेली भाषणं ऐकल्यास त्यांच्या भारताबद्दलच्या भूमिकेचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो. पाकिस्तानी सैन्याचा आणि आयएसआयचा वापर करून इम्रान खान गैरमार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताहेत, असा आरोप नवाज शरीफ यांच्या पक्षाने केला होता. त्यावर इम्रान खान यांनी वेगळाच बाउन्सर टाकला होता. 

भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवाज शरीफ प्यारे आहेत, पण ते आपल्या सैन्याचा तिरस्कार करतात. मी पंतप्रधान झालो, तर पाकिस्तानसाठी काम करेन, अशी भीती शरीफना वाटतेय, असं सांगत त्यांनी भारतविरोधाचा मुद्दा तीव्र केला होता. नवाज शरीफ हे आधुनिक मीर जाफर असल्याचा हल्ला इम्रान खान यांनी चढवला होता. काश्मीरमधील हिंसाचाराला सर्वस्वी भारतच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी प्रचारात केला होता. तसंच, सर्जिकल स्ट्राइकनंतर त्यांनी भारताला अद्दल घडवण्याची भाषाही केली होती. मोदींना कसं प्रत्युत्तर द्यायचं हे मी नवाज शरीफांना सांगेन, असं तिखट ट्विट त्यांनी केलं होतं. त्यामुळे आता इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर भारत-पाकमधील दरी आणखी वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांना वाटतेय. 

इम्रान खान यांना कोण, का म्हणतं 'तालिबान खान'?

पाकिस्तानातील उदारमतवाद्यांच्या वर्गात इम्रान खान यांची वेगळी ओळख आहे आणि ती म्हणजे, तालिबान खान. त्याचं कारण आहे, इम्रान खान यांनी केलेला तालिबानी दहशतवाद्याचा गौरव. २०१३ मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा कमांडर वली-उर-रहमान अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. त्याला इम्रान खान यांनी 'शांती समर्थक' अशी उपाधी दिली होती. इतकंच नव्हे तर, गेल्या वर्षी हक्कानी मदरशाला ३० लाख डॉलर्सची मदत देऊन पश्चिम प्रांत खैबर पख्तुनख्वा येथील सरकारने सगळ्यांनाच धक्का दिला होता. या सरकारमध्ये इम्रान खान यांचा पक्षही सहभागी आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांच्या हातात सत्ता गेल्यास कट्टरपंथीयांचं फावेल आणि भारताला धोका वाढेल, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानNawaz Sharifनवाज शरीफNarendra Modiनरेंद्र मोदी