शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Pakistan Election Results: इम्रान खान यांचं 'तालिबान खान' व्हर्जन भारतासाठी धोक्याचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 11:45 IST

Pakistan Election Results: पाकिस्तान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, इम्रान खान यांनी केलेली भाषणं ऐकल्यास त्यांच्या भारताबद्दलच्या भूमिकेचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो.

नवी दिल्लीः पाकिस्तान क्रिकेट संघाला 'अच्छे दिन' दाखवणारा माजी क्रिकेटपटू इम्रान खान आता या देशाचा पंतप्रधान होण्याच्या दिशेनं कूच करतोय. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी जसजशी पुढे सरकतेय, तसतसा इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष वरचढ होत चाललाय. पाकिस्तानात पीटीआयची सत्ता येणं, इम्रान खान यांनी पंतप्रधान होणं हे भारतासाठी तापदायक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. विशेषतः इम्रान खान यांची 'तालिबान खान' ही प्रतिमा पाहता, येत्या काळात भारताची डोकेदुखी वाढू शकते, असं बोललं जातंय. 

पाकिस्तान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, इम्रान खान यांनी केलेली भाषणं ऐकल्यास त्यांच्या भारताबद्दलच्या भूमिकेचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो. पाकिस्तानी सैन्याचा आणि आयएसआयचा वापर करून इम्रान खान गैरमार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताहेत, असा आरोप नवाज शरीफ यांच्या पक्षाने केला होता. त्यावर इम्रान खान यांनी वेगळाच बाउन्सर टाकला होता. 

भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवाज शरीफ प्यारे आहेत, पण ते आपल्या सैन्याचा तिरस्कार करतात. मी पंतप्रधान झालो, तर पाकिस्तानसाठी काम करेन, अशी भीती शरीफना वाटतेय, असं सांगत त्यांनी भारतविरोधाचा मुद्दा तीव्र केला होता. नवाज शरीफ हे आधुनिक मीर जाफर असल्याचा हल्ला इम्रान खान यांनी चढवला होता. काश्मीरमधील हिंसाचाराला सर्वस्वी भारतच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी प्रचारात केला होता. तसंच, सर्जिकल स्ट्राइकनंतर त्यांनी भारताला अद्दल घडवण्याची भाषाही केली होती. मोदींना कसं प्रत्युत्तर द्यायचं हे मी नवाज शरीफांना सांगेन, असं तिखट ट्विट त्यांनी केलं होतं. त्यामुळे आता इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर भारत-पाकमधील दरी आणखी वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांना वाटतेय. 

इम्रान खान यांना कोण, का म्हणतं 'तालिबान खान'?

पाकिस्तानातील उदारमतवाद्यांच्या वर्गात इम्रान खान यांची वेगळी ओळख आहे आणि ती म्हणजे, तालिबान खान. त्याचं कारण आहे, इम्रान खान यांनी केलेला तालिबानी दहशतवाद्याचा गौरव. २०१३ मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा कमांडर वली-उर-रहमान अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. त्याला इम्रान खान यांनी 'शांती समर्थक' अशी उपाधी दिली होती. इतकंच नव्हे तर, गेल्या वर्षी हक्कानी मदरशाला ३० लाख डॉलर्सची मदत देऊन पश्चिम प्रांत खैबर पख्तुनख्वा येथील सरकारने सगळ्यांनाच धक्का दिला होता. या सरकारमध्ये इम्रान खान यांचा पक्षही सहभागी आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांच्या हातात सत्ता गेल्यास कट्टरपंथीयांचं फावेल आणि भारताला धोका वाढेल, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानNawaz Sharifनवाज शरीफNarendra Modiनरेंद्र मोदी