शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

Pakistan Election Results: इम्रान खान यांचं 'तालिबान खान' व्हर्जन भारतासाठी धोक्याचं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 11:45 IST

Pakistan Election Results: पाकिस्तान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, इम्रान खान यांनी केलेली भाषणं ऐकल्यास त्यांच्या भारताबद्दलच्या भूमिकेचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो.

नवी दिल्लीः पाकिस्तान क्रिकेट संघाला 'अच्छे दिन' दाखवणारा माजी क्रिकेटपटू इम्रान खान आता या देशाचा पंतप्रधान होण्याच्या दिशेनं कूच करतोय. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी जसजशी पुढे सरकतेय, तसतसा इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष वरचढ होत चाललाय. पाकिस्तानात पीटीआयची सत्ता येणं, इम्रान खान यांनी पंतप्रधान होणं हे भारतासाठी तापदायक असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. विशेषतः इम्रान खान यांची 'तालिबान खान' ही प्रतिमा पाहता, येत्या काळात भारताची डोकेदुखी वाढू शकते, असं बोललं जातंय. 

पाकिस्तान निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, इम्रान खान यांनी केलेली भाषणं ऐकल्यास त्यांच्या भारताबद्दलच्या भूमिकेचा स्पष्ट अंदाज येऊ शकतो. पाकिस्तानी सैन्याचा आणि आयएसआयचा वापर करून इम्रान खान गैरमार्गाने निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करताहेत, असा आरोप नवाज शरीफ यांच्या पक्षाने केला होता. त्यावर इम्रान खान यांनी वेगळाच बाउन्सर टाकला होता. 

भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नवाज शरीफ प्यारे आहेत, पण ते आपल्या सैन्याचा तिरस्कार करतात. मी पंतप्रधान झालो, तर पाकिस्तानसाठी काम करेन, अशी भीती शरीफना वाटतेय, असं सांगत त्यांनी भारतविरोधाचा मुद्दा तीव्र केला होता. नवाज शरीफ हे आधुनिक मीर जाफर असल्याचा हल्ला इम्रान खान यांनी चढवला होता. काश्मीरमधील हिंसाचाराला सर्वस्वी भारतच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी प्रचारात केला होता. तसंच, सर्जिकल स्ट्राइकनंतर त्यांनी भारताला अद्दल घडवण्याची भाषाही केली होती. मोदींना कसं प्रत्युत्तर द्यायचं हे मी नवाज शरीफांना सांगेन, असं तिखट ट्विट त्यांनी केलं होतं. त्यामुळे आता इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर भारत-पाकमधील दरी आणखी वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांना वाटतेय. 

इम्रान खान यांना कोण, का म्हणतं 'तालिबान खान'?

पाकिस्तानातील उदारमतवाद्यांच्या वर्गात इम्रान खान यांची वेगळी ओळख आहे आणि ती म्हणजे, तालिबान खान. त्याचं कारण आहे, इम्रान खान यांनी केलेला तालिबानी दहशतवाद्याचा गौरव. २०१३ मध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चा कमांडर वली-उर-रहमान अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. त्याला इम्रान खान यांनी 'शांती समर्थक' अशी उपाधी दिली होती. इतकंच नव्हे तर, गेल्या वर्षी हक्कानी मदरशाला ३० लाख डॉलर्सची मदत देऊन पश्चिम प्रांत खैबर पख्तुनख्वा येथील सरकारने सगळ्यांनाच धक्का दिला होता. या सरकारमध्ये इम्रान खान यांचा पक्षही सहभागी आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांच्या हातात सत्ता गेल्यास कट्टरपंथीयांचं फावेल आणि भारताला धोका वाढेल, याकडे राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधलं. 

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानNawaz Sharifनवाज शरीफNarendra Modiनरेंद्र मोदी