शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
2
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
9
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
10
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
11
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
12
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
13
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
14
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
15
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
16
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
17
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
18
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
19
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
20
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी

भारताला अस्थिर करण्याचा पाकचा डाव

By admin | Updated: July 22, 2016 04:28 IST

जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हिंसक घटनांना पाकिस्तान जबाबदार असून, काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हिंसक घटनांना पाकिस्तान जबाबदार असून, काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे. असा थेट आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अगदी परखड शब्दांत सांगितले की, पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत आहे. तथापि, भारतापुढे आव्हान असेल तेव्हा सर्व जण आपसांतील मतभेद सारून या आव्हानांचा कणखरपणे मुकाबला करतील, असा विश्वासही त्यांनी लोकसभेत व्यक्त केला.जम्मू-काश्मीरवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान आपले अपयश आणि दहशतवादी कारवायांवर पांघरूण टाकण्यासाठी असले उद्योग करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. धर्माच्या नावाने वेगळे झालेला पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचे कटकारस्थान करीत आहे. इकडे काश्मीर हिंसाचाराने धुमसत असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशात सैर करीत होते. हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. पंतप्रधान सातत्याने माझ्याशी संपर्क राखून होते. विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर लागलीच त्यांनी काश्मीरवर बैठक बोलावली होती. तथापि, तेथील परिस्थिती कोणा एकाला ठीक करता येणार नाही. त्यासाठी त्यांनी सर्व पक्षांचे सहकार्यही मागितले.>‘पेलेट गन’ला पर्याय शोधूजमावाला पांगविण्यासाठी ‘पेलेट गन’चा वापर केल्यावरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणाले की, प्राणघातक ठरणार नाही, अशा शस्त्राचा पहिल्यांदा वापर केला पाहिजे होता. ‘पेलेट गन’ला पर्याय शोधला जाईल. त्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. ही समिती दोन महिन्यांत अहवाल देईल.