शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

भारताला अस्थिर करण्याचा पाकचा डाव

By admin | Updated: July 22, 2016 04:28 IST

जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हिंसक घटनांना पाकिस्तान जबाबदार असून, काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हिंसक घटनांना पाकिस्तान जबाबदार असून, काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे. असा थेट आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अगदी परखड शब्दांत सांगितले की, पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत आहे. तथापि, भारतापुढे आव्हान असेल तेव्हा सर्व जण आपसांतील मतभेद सारून या आव्हानांचा कणखरपणे मुकाबला करतील, असा विश्वासही त्यांनी लोकसभेत व्यक्त केला.जम्मू-काश्मीरवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान आपले अपयश आणि दहशतवादी कारवायांवर पांघरूण टाकण्यासाठी असले उद्योग करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. धर्माच्या नावाने वेगळे झालेला पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचे कटकारस्थान करीत आहे. इकडे काश्मीर हिंसाचाराने धुमसत असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशात सैर करीत होते. हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. पंतप्रधान सातत्याने माझ्याशी संपर्क राखून होते. विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर लागलीच त्यांनी काश्मीरवर बैठक बोलावली होती. तथापि, तेथील परिस्थिती कोणा एकाला ठीक करता येणार नाही. त्यासाठी त्यांनी सर्व पक्षांचे सहकार्यही मागितले.>‘पेलेट गन’ला पर्याय शोधूजमावाला पांगविण्यासाठी ‘पेलेट गन’चा वापर केल्यावरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणाले की, प्राणघातक ठरणार नाही, अशा शस्त्राचा पहिल्यांदा वापर केला पाहिजे होता. ‘पेलेट गन’ला पर्याय शोधला जाईल. त्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. ही समिती दोन महिन्यांत अहवाल देईल.