शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भारताला अस्थिर करण्याचा पाकचा डाव

By admin | Updated: July 22, 2016 04:28 IST

जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हिंसक घटनांना पाकिस्तान जबाबदार असून, काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर खोऱ्यातील हिंसक घटनांना पाकिस्तान जबाबदार असून, काश्मीरमधील दहशतवादामागे पाकिस्तानच आहे. असा थेट आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अगदी परखड शब्दांत सांगितले की, पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत आहे. तथापि, भारतापुढे आव्हान असेल तेव्हा सर्व जण आपसांतील मतभेद सारून या आव्हानांचा कणखरपणे मुकाबला करतील, असा विश्वासही त्यांनी लोकसभेत व्यक्त केला.जम्मू-काश्मीरवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान आपले अपयश आणि दहशतवादी कारवायांवर पांघरूण टाकण्यासाठी असले उद्योग करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. धर्माच्या नावाने वेगळे झालेला पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचे कटकारस्थान करीत आहे. इकडे काश्मीर हिंसाचाराने धुमसत असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशात सैर करीत होते. हा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. पंतप्रधान सातत्याने माझ्याशी संपर्क राखून होते. विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर लागलीच त्यांनी काश्मीरवर बैठक बोलावली होती. तथापि, तेथील परिस्थिती कोणा एकाला ठीक करता येणार नाही. त्यासाठी त्यांनी सर्व पक्षांचे सहकार्यही मागितले.>‘पेलेट गन’ला पर्याय शोधूजमावाला पांगविण्यासाठी ‘पेलेट गन’चा वापर केल्यावरून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणाले की, प्राणघातक ठरणार नाही, अशा शस्त्राचा पहिल्यांदा वापर केला पाहिजे होता. ‘पेलेट गन’ला पर्याय शोधला जाईल. त्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. ही समिती दोन महिन्यांत अहवाल देईल.