शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यासमोर त्यांच्या आईला विधवा म्हणून आणलं - सुषमा स्वराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 12:21 IST

कुलभूषण जाधव यांची आई नेहमी साडी परिधान करते  पण पाकिस्तानने त्यांना ड्रेस घालायला भाग पाडला असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.

ठळक मुद्देसुरक्षेच्या नावाखाली कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीचे कपडे बदलण्यात आले.पाकिस्तानात यावर काहीतरी कट शिजत असल्याची शक्यता स्वराज यांनी व्यक्त केली. 

नवी दिल्ली - कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी दोघी विवाहित आहेत. पण पाकिस्तानने दोघींच्या गळयातून मंगळसूत्र, टिकली आणि हातातील बांगडया काढायला लावल्या आणि विधवा म्हणून त्यांना कुलभूषण यांच्यासमोर आणले. कुलभूषण यांची आई अवंती त्यांच्यासमोर आली तेव्हा तिच्या गळयात मंगळसूत्र आणि डोक्यावर टिकली नव्हती. आईला त्या अवस्थेत पाहून कुलभूषण यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व त्यांनी बाबा कसे आहेत असा पहिला प्रश्न विचारला. 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत आज ही माहिती दिली.मराठी ही जाधव कुटुंबाची मातृभाषा आहे. मातृभाषेत संवाद साधणे केव्हाही सोपे पडते. त्यामुळे कुलभूषण यांच्या आईने त्यांच्याशी मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पाकिस्तानने त्यांचा इंटरकॉम फोन बंद केला. कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईला पाकिस्तानात अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. पाकिस्तानने जाधव कुटुंबांच्या मानवधिकाराचे उल्लंघन केले असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला. 

जाधव कुटुंबीय पाकिस्तानात असताना मीडियाला त्यांच्याजवळ येऊ द्यायचे नाही असे दोन्ही देशांमध्ये ठरले होते. पण पाकिस्तानने आपला शब्द पाळला नाही. पाकिस्तानी माध्यमांनी जाधव कुटुंबाला गाठून त्यांना प्रश्नच विचारले नाहीत तर त्यांना छळलं, टोमणे मारले असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. 

 

 

सुरक्षेच्या नावाखाली कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीचे कपडे बदलण्यात आले. कुलभूषण जाधव यांची आई नेहमी साडी परिधान करते  पण पाकिस्तानने त्यांना ड्रेस घालायला भाग पाडला असे सुषमा स्वराज यांनी सांगितले. पाकिस्तानने सुरक्षेच्या नावाखाली जाधव यांच्या पत्नीचे बूट जप्त केले आहेत. त्या बुटांमध्ये धातूची चीप असल्याच्या बातम्या आता पाकिस्तानातून येत आहेत. पाकिस्तानात यावर काहीतरी कट शिजत असल्याची शक्यता स्वराज यांनी व्यक्त केली. 

जाधव यांच्या पत्नीने एअर इंडियाच्या विमानाने दुबई तिथून एमिराटसच्या विमानाने पाकिस्तानात गेल्या. जर त्यांच्या पत्नीच्या बुटामध्ये चीप होती मग ती चीप पाकिस्तानी विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना कशी सापडली नाही ? असा सवाल स्वराज यांनी विचारला. पाकिस्तानने त्यांच्या देशातील प्रसारमाध्यमांना जाधव कुटुंबाला त्रास देण्याची संधी दिल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधव