शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ना'पाक'कडून आता LoCवर हल्ला, नौशेरातील एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 09:16 IST

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्ताननं बुधवारी (23 मे) आता LoCला लक्ष्य केले आहे. बुधवारी रात्री उशिरा पाकिस्ताननं उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात तोफगोळ्यांचा मारा केला. बारामुल्ला जिल्ह्यामध्येही LoCवर गोळीबार क करण्यात आला. स्वयंचलित शस्त्रास्त्र आणि तोफगोळ्यांच्या सहाय्यानं पाकिस्ताननं हल्ला केला. 

कुरापती पाकिस्तानानं नौशेरा सेक्टरमध्येही गोळीबार केला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सकडून जम्मू, कथुआ आणि सांबा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळील गावांना आणि लष्करी चौक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे परिसरातील सरकारी तसंच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.  

तर जम्मू, सांबा आणि कथुआ जिल्ह्यातील गावांना व लष्करी तळांवर गेल्या 10 दिवसांपासून पाकिस्तानकडून हल्ला होत असल्यानं 40,000 हून अधिक जणांना स्थलांतर करावं लागले आहे. तेथील किमान 100 गावे ताबडतोब रिकामी करण्यात आली आहेत. त्या भागांतील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, रहिवाशांना अन्यत्र हलविण्याचे काम सुरू केले आहे.

मंगळवारी सकाळीही एक आठ महिन्यांचे मूल मरण पावले होते. सोमवारी एक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पाक दुतावासातील अधिका-याला परराष्ट्र खात्याने बोलावून गंभीर समज दिली. ‘गेल्या 9 दिवसांत पाकच्या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या 10 झाली आहे. 2 जवानही शहीद झाले.  

बीएसएफच्या ४0 चौक्यांवर गोळीबार, तोफांचा मारापाकिस्तानने बीएसएफच्या जवळपास ४0 चौक्यांना लक्ष्य केले असून, गोळीबाराबरोबरच सीमेपलिकडून तोफांचा माराही सुरू आहे.गोळीबार व तोफमारा यांमुळे सीमेवरील गावांतील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर काही घरी आता राहण्यायोग्य राहिलेलीच नाहीत. या प्रकारामुळे नियंत्रण रेषेवरील गावांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. सुमारे १00 गावांतील लोकांना पोलीस व सशस्त्र दलांच्या मदतीने सुरक्षित छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यापाकिस्तानच्या हल्ल्यांना त्याहून अधिक आक्रमकपणे उत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारीच बीएसफएफच्या जवानांना दिल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. तीन दिवसांपूर्वी बीएसएफने पाकच्या अनेक चौक्या पार उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी आता हल्ले थांबवा, अशी गयावया बीएसएफला केली होती. पण स्वत: मात्र गोळीबार थांबवला नाही. 

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान