शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

ना'पाक'कडून आता LoCवर हल्ला, नौशेरातील एक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 09:16 IST

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्ताननं बुधवारी (23 मे) आता LoCला लक्ष्य केले आहे. बुधवारी रात्री उशिरा पाकिस्ताननं उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात तोफगोळ्यांचा मारा केला. बारामुल्ला जिल्ह्यामध्येही LoCवर गोळीबार क करण्यात आला. स्वयंचलित शस्त्रास्त्र आणि तोफगोळ्यांच्या सहाय्यानं पाकिस्ताननं हल्ला केला. 

कुरापती पाकिस्तानानं नौशेरा सेक्टरमध्येही गोळीबार केला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला. दरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सकडून जम्मू, कथुआ आणि सांबा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळील गावांना आणि लष्करी चौक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे परिसरातील सरकारी तसंच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.  

तर जम्मू, सांबा आणि कथुआ जिल्ह्यातील गावांना व लष्करी तळांवर गेल्या 10 दिवसांपासून पाकिस्तानकडून हल्ला होत असल्यानं 40,000 हून अधिक जणांना स्थलांतर करावं लागले आहे. तेथील किमान 100 गावे ताबडतोब रिकामी करण्यात आली आहेत. त्या भागांतील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, रहिवाशांना अन्यत्र हलविण्याचे काम सुरू केले आहे.

मंगळवारी सकाळीही एक आठ महिन्यांचे मूल मरण पावले होते. सोमवारी एक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पाक दुतावासातील अधिका-याला परराष्ट्र खात्याने बोलावून गंभीर समज दिली. ‘गेल्या 9 दिवसांत पाकच्या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या 10 झाली आहे. 2 जवानही शहीद झाले.  

बीएसएफच्या ४0 चौक्यांवर गोळीबार, तोफांचा मारापाकिस्तानने बीएसएफच्या जवळपास ४0 चौक्यांना लक्ष्य केले असून, गोळीबाराबरोबरच सीमेपलिकडून तोफांचा माराही सुरू आहे.गोळीबार व तोफमारा यांमुळे सीमेवरील गावांतील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर काही घरी आता राहण्यायोग्य राहिलेलीच नाहीत. या प्रकारामुळे नियंत्रण रेषेवरील गावांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. सुमारे १00 गावांतील लोकांना पोलीस व सशस्त्र दलांच्या मदतीने सुरक्षित छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यापाकिस्तानच्या हल्ल्यांना त्याहून अधिक आक्रमकपणे उत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारीच बीएसफएफच्या जवानांना दिल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. तीन दिवसांपूर्वी बीएसएफने पाकच्या अनेक चौक्या पार उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी आता हल्ले थांबवा, अशी गयावया बीएसएफला केली होती. पण स्वत: मात्र गोळीबार थांबवला नाही. 

 

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान