शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

क्लस्टर बॉम्ब वर्षावाचे पाकिस्तानचे आरोप खोटे; जवानांकडून सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 20:45 IST

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी सीमेवर जोरदार फायरिंग सुरू आहे.

नवी दिल्ली : भारत पाकिस्तानच्या सीमेमध्ये क्लस्टर बॉम्ब वर्षाव करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. मात्र, पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार केला जात असून त्याच्या मदतीने दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसविण्याचे प्रकार सुरू असल्याचे प्रत्यूत्तर भारतीय सैन्याने दिले आहे.

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी सीमेवर जोरदार फायरिंग सुरू आहे. आम्ही फक्त त्यांच्या गोळीबाराला प्रत्यूत्तर देतो. आमचे जवान पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरी करत असलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहेत. भारत क्लस्टर बॉम्ब वापरत असल्याचा आरोप हा पाकिस्तानचा खोटेपणा असल्याचे लष्कारने आज सांगितले. 

भारतीय सेनेने सांगितले की, पाकिस्तान नेहमी गोळीबार करत त्याच्या आड घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतेय. त्यांच्याशी उच्चस्तरीय चर्चेवेळी अनेकदा ही बाब सांगितली आहे. तसेच पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देण्याचे अधिकार भारताकडे सुरक्षित असल्याचेही त्यांना सांगितले आहे. 

क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय? क्लस्टर बॉम्ब खूप विध्वंसक असतात. हा काही बॉम्बचा गुच्छ असतो. हे बॉम्ब लढाऊ विमानांतून खाली टाकले जातात. एका क्लस्टर बॉम्बमध्ये काही बॉम्बचे गुच्छ असतात. हे बॉम्ब टाकल्यानंतर हवेतच वेगळे होऊन काही मैल उडू शकतात. हे बॉम्ब जेथे पडतात तेथे 25 ते 30 मीटरच्या भागात जबरदस्त नुकसान करतात.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानTerrorismदहशतवाद