शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

भारताच्या हवाई तळावर पाक अतिरेक्यांचा हल्ला

By admin | Updated: January 3, 2016 05:09 IST

मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील

पठाणकोट : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला. भारत-पाकिस्तान सरहद्दीपासून सर्वांत जवळ असलेल्या या हवाई तळावर हल्लेखोरांना रोखण्यास झालेल्या तब्बल १५ तासांच्या चकमकीत भारतीय जवानांनी प्राणांची बाजी लावली. या भीषण चकमकीत पाचही हल्लेखोरांना कंठस्नान घालताना तीन जवान शहीद झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या थेट देखरेखीखाली दहशतवाद्यांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली. या हल्ल्यामुळे एकाचवेळी पंजाब पोलिसांची ढिलाई व डोवल यांच्या देखरेखीतील गुप्तचरांची तत्परता अधोरेखित झाली. गुरुवारी रात्री पंजाब पोलिसांच्या एका एसपीचे काही सशस्त्र दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर हल्ल्याच्या संशयाने डोवल यांनी एनएसजी कमांडोंचे एक पथक शुक्रवारी रात्रीच येथे पाठविले होते. याशिवाय लष्कराची एक तुकडीही तळावर तैनात करण्यात आली होती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता व चर्चेच्या प्रक्रियेत खोडा घालण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला होता, अशी आपली विश्वसनीय माहिती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले, तर आम्हाला शांतता हवी असली तरी जसास तसे प्रत्युत्तर मिळेल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. विशेष म्हणजे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर पंजाब, दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसह देशभरात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमध्ये गेल्या सहा महिन्यात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी २७ जुलैला गुरुदासपूरमधील एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.आरडीएक्ससह घुसले दहशतवादीमोठ्या प्रमाणात आरडीएक्ससह या दहशतवाद्यांनी जंगलात असलेल्या हवाईदल तळाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. परंतु ते तळाच्या बाह्य भागात असलेल्या ‘लंगर’मधून पुढे सरकू शकले नाहीत. कारण सुरक्षा दलाचे जवान त्यांचा मुकाबला करण्यास सज्ज होते. हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी कंट्रोल रूममध्ये बसूनया संपूर्ण घडामोडींवर नजर ठेवून होते.दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापरहवाईदल तळावर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. परंतु तळाचे सुरक्षा कवच भेदून दहशतवादी आत प्रवेश करूशकले नाहीत. त्यांना सुरक्षा दलाने बाहेरच रोखून धरले. सुरुवातीस जवळपास पाच तास चाललेल्या या भीषण चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर आणखी काही दहशतवादी दडले आहेत का, हे पाहण्यासाठी लागलीच शोधमोहीम राबविण्यात आली. त्यादरम्यान झालेल्या गोळीबार आणि स्फोटांनंतर लष्कराने आॅपरेशन जारी ठेवले. अखेर दडून बसलेल्या पाचव्या दहशतवाद्यालाही सायंकाळी उशिरा कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. हा दहशतवादी झुडपी भागात दडून ग्रेनेड््सचा हल्ला करीत होता. हा संशयित दहशतवादी ज्या भागात दडून बसला होता त्या संपूर्ण परिसराला वेढा घातल्यावर त्याला शोधण्याकरिता ड्रोनचाही वापर केला गेला.दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरिता हवाईदलाने संयुक्त दलाच्या मदतीसाठी एमआय-२५ बनावटीची दोन लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली होती. या हल्ल्याने तळाच्या गाभ्याला कुठलाही धक्का बसला नसून येथील हेलिकॉप्टर आणि इतर सामग्री सुरक्षित आहे.हवाईदलाच्या या तळावर मिग-२१ लढाऊ विमाने व एमआय-२५ लढाऊ हेलिकॉप्टरचा ताफा आहे.हा हल्ला भारताची प्रगती न पाहवणाऱ्या ‘मानवतेच्या शत्रूंनी’ रचलेले कारस्थान आहे. देशाच्या शत्रूचे असे कुटिल डाव हाणून पाडण्यास आपली सशस्त्र सेनादले पूर्णपणे समर्थ आहेत.- नरेंद्र मोदी