शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

भारताच्या हवाई तळावर पाक अतिरेक्यांचा हल्ला

By admin | Updated: January 3, 2016 05:09 IST

मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील

पठाणकोट : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला. भारत-पाकिस्तान सरहद्दीपासून सर्वांत जवळ असलेल्या या हवाई तळावर हल्लेखोरांना रोखण्यास झालेल्या तब्बल १५ तासांच्या चकमकीत भारतीय जवानांनी प्राणांची बाजी लावली. या भीषण चकमकीत पाचही हल्लेखोरांना कंठस्नान घालताना तीन जवान शहीद झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या थेट देखरेखीखाली दहशतवाद्यांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली. या हल्ल्यामुळे एकाचवेळी पंजाब पोलिसांची ढिलाई व डोवल यांच्या देखरेखीतील गुप्तचरांची तत्परता अधोरेखित झाली. गुरुवारी रात्री पंजाब पोलिसांच्या एका एसपीचे काही सशस्त्र दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर हल्ल्याच्या संशयाने डोवल यांनी एनएसजी कमांडोंचे एक पथक शुक्रवारी रात्रीच येथे पाठविले होते. याशिवाय लष्कराची एक तुकडीही तळावर तैनात करण्यात आली होती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता व चर्चेच्या प्रक्रियेत खोडा घालण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला होता, अशी आपली विश्वसनीय माहिती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले, तर आम्हाला शांतता हवी असली तरी जसास तसे प्रत्युत्तर मिळेल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. विशेष म्हणजे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर पंजाब, दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसह देशभरात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमध्ये गेल्या सहा महिन्यात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी २७ जुलैला गुरुदासपूरमधील एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.आरडीएक्ससह घुसले दहशतवादीमोठ्या प्रमाणात आरडीएक्ससह या दहशतवाद्यांनी जंगलात असलेल्या हवाईदल तळाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. परंतु ते तळाच्या बाह्य भागात असलेल्या ‘लंगर’मधून पुढे सरकू शकले नाहीत. कारण सुरक्षा दलाचे जवान त्यांचा मुकाबला करण्यास सज्ज होते. हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी कंट्रोल रूममध्ये बसूनया संपूर्ण घडामोडींवर नजर ठेवून होते.दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापरहवाईदल तळावर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. परंतु तळाचे सुरक्षा कवच भेदून दहशतवादी आत प्रवेश करूशकले नाहीत. त्यांना सुरक्षा दलाने बाहेरच रोखून धरले. सुरुवातीस जवळपास पाच तास चाललेल्या या भीषण चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर आणखी काही दहशतवादी दडले आहेत का, हे पाहण्यासाठी लागलीच शोधमोहीम राबविण्यात आली. त्यादरम्यान झालेल्या गोळीबार आणि स्फोटांनंतर लष्कराने आॅपरेशन जारी ठेवले. अखेर दडून बसलेल्या पाचव्या दहशतवाद्यालाही सायंकाळी उशिरा कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. हा दहशतवादी झुडपी भागात दडून ग्रेनेड््सचा हल्ला करीत होता. हा संशयित दहशतवादी ज्या भागात दडून बसला होता त्या संपूर्ण परिसराला वेढा घातल्यावर त्याला शोधण्याकरिता ड्रोनचाही वापर केला गेला.दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरिता हवाईदलाने संयुक्त दलाच्या मदतीसाठी एमआय-२५ बनावटीची दोन लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली होती. या हल्ल्याने तळाच्या गाभ्याला कुठलाही धक्का बसला नसून येथील हेलिकॉप्टर आणि इतर सामग्री सुरक्षित आहे.हवाईदलाच्या या तळावर मिग-२१ लढाऊ विमाने व एमआय-२५ लढाऊ हेलिकॉप्टरचा ताफा आहे.हा हल्ला भारताची प्रगती न पाहवणाऱ्या ‘मानवतेच्या शत्रूंनी’ रचलेले कारस्थान आहे. देशाच्या शत्रूचे असे कुटिल डाव हाणून पाडण्यास आपली सशस्त्र सेनादले पूर्णपणे समर्थ आहेत.- नरेंद्र मोदी