शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या हवाई तळावर पाक अतिरेक्यांचा हल्ला

By admin | Updated: January 3, 2016 05:09 IST

मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील

पठाणकोट : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला. भारत-पाकिस्तान सरहद्दीपासून सर्वांत जवळ असलेल्या या हवाई तळावर हल्लेखोरांना रोखण्यास झालेल्या तब्बल १५ तासांच्या चकमकीत भारतीय जवानांनी प्राणांची बाजी लावली. या भीषण चकमकीत पाचही हल्लेखोरांना कंठस्नान घालताना तीन जवान शहीद झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या थेट देखरेखीखाली दहशतवाद्यांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली. या हल्ल्यामुळे एकाचवेळी पंजाब पोलिसांची ढिलाई व डोवल यांच्या देखरेखीतील गुप्तचरांची तत्परता अधोरेखित झाली. गुरुवारी रात्री पंजाब पोलिसांच्या एका एसपीचे काही सशस्त्र दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर हल्ल्याच्या संशयाने डोवल यांनी एनएसजी कमांडोंचे एक पथक शुक्रवारी रात्रीच येथे पाठविले होते. याशिवाय लष्कराची एक तुकडीही तळावर तैनात करण्यात आली होती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता व चर्चेच्या प्रक्रियेत खोडा घालण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला होता, अशी आपली विश्वसनीय माहिती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले, तर आम्हाला शांतता हवी असली तरी जसास तसे प्रत्युत्तर मिळेल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. विशेष म्हणजे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर पंजाब, दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसह देशभरात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमध्ये गेल्या सहा महिन्यात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी २७ जुलैला गुरुदासपूरमधील एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.आरडीएक्ससह घुसले दहशतवादीमोठ्या प्रमाणात आरडीएक्ससह या दहशतवाद्यांनी जंगलात असलेल्या हवाईदल तळाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. परंतु ते तळाच्या बाह्य भागात असलेल्या ‘लंगर’मधून पुढे सरकू शकले नाहीत. कारण सुरक्षा दलाचे जवान त्यांचा मुकाबला करण्यास सज्ज होते. हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी कंट्रोल रूममध्ये बसूनया संपूर्ण घडामोडींवर नजर ठेवून होते.दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापरहवाईदल तळावर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. परंतु तळाचे सुरक्षा कवच भेदून दहशतवादी आत प्रवेश करूशकले नाहीत. त्यांना सुरक्षा दलाने बाहेरच रोखून धरले. सुरुवातीस जवळपास पाच तास चाललेल्या या भीषण चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर आणखी काही दहशतवादी दडले आहेत का, हे पाहण्यासाठी लागलीच शोधमोहीम राबविण्यात आली. त्यादरम्यान झालेल्या गोळीबार आणि स्फोटांनंतर लष्कराने आॅपरेशन जारी ठेवले. अखेर दडून बसलेल्या पाचव्या दहशतवाद्यालाही सायंकाळी उशिरा कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. हा दहशतवादी झुडपी भागात दडून ग्रेनेड््सचा हल्ला करीत होता. हा संशयित दहशतवादी ज्या भागात दडून बसला होता त्या संपूर्ण परिसराला वेढा घातल्यावर त्याला शोधण्याकरिता ड्रोनचाही वापर केला गेला.दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरिता हवाईदलाने संयुक्त दलाच्या मदतीसाठी एमआय-२५ बनावटीची दोन लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली होती. या हल्ल्याने तळाच्या गाभ्याला कुठलाही धक्का बसला नसून येथील हेलिकॉप्टर आणि इतर सामग्री सुरक्षित आहे.हवाईदलाच्या या तळावर मिग-२१ लढाऊ विमाने व एमआय-२५ लढाऊ हेलिकॉप्टरचा ताफा आहे.हा हल्ला भारताची प्रगती न पाहवणाऱ्या ‘मानवतेच्या शत्रूंनी’ रचलेले कारस्थान आहे. देशाच्या शत्रूचे असे कुटिल डाव हाणून पाडण्यास आपली सशस्त्र सेनादले पूर्णपणे समर्थ आहेत.- नरेंद्र मोदी