शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

“गुजरात अमली पदार्थाची वाहतूक, सेवनाचं सर्वांत मोठं पोर्ट, पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची गरज”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:10 IST

मुंबईमधील एनसीबीचे गाजलेले अधिकारी आहेत त्यांना गुजरातची जबाबदारी दिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी बोटीतून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४०० कोटी रुपये आहे. अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पाकिस्तानी बोटीतील सात जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांनी (PM Modi) यात विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला असे वाटते की आर्यन खानला वगैरे पकडून तमाशा करणारे, नवाब मलिक यांच्या जावयाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणारे जे मुंबईमधील एनसीबीचे गाजलेले अधिकारी आहेत त्यांना गुजरातची जबाबदारी दिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

गुजरातअमली पदार्थाची वाहतूक, सेवनाचे सर्वांत मोठे पोर्ट

गुजरात हे अमली पदार्थाच्या वाहतुकीचे, सेवनाचे सर्वात मोठे पोर्ट झालेले दिसत आहे. ही गंभीर गोष्ट आहे. संपूर्ण देशाला एखाद्या नशेत गुंग करण्यासाठी गुजरातच्या भूमीचा वापर होतोय का, यासाठी पंतप्रधानांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या महिन्यात एटीएसने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका बांधकामाधीन घरातून सुमारे ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन ड्रग्जची खेप जप्त केली होती. पाकिस्तानी ड्रग्ज विक्रेत्यांनी ही खेप अरबी समुद्रमार्गे त्यांच्या भारतीय समकक्षांना पाठवली होती, असे एटीएसने म्हटले होते. तत्पूर्वी, कच्छमधील मुंद्रा बंदरात भारतातील सर्वांत मोठ्या हेरॉईनचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केला होता. दोन कंटेनरमधून सुमारे ३ हजार किलो ड्रग्ज जप्त केले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत २१ हजार कोटी रुपये होती. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थSanjay Rautसंजय राऊतprime ministerपंतप्रधानGujaratगुजरात