शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

“गुजरात अमली पदार्थाची वाहतूक, सेवनाचं सर्वांत मोठं पोर्ट, पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची गरज”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:10 IST

मुंबईमधील एनसीबीचे गाजलेले अधिकारी आहेत त्यांना गुजरातची जबाबदारी दिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या एका पाकिस्तानी बोटीतून ७७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले. या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४०० कोटी रुपये आहे. अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पाकिस्तानी बोटीतील सात जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांनी (PM Modi) यात विशेष लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 

नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मला असे वाटते की आर्यन खानला वगैरे पकडून तमाशा करणारे, नवाब मलिक यांच्या जावयाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणारे जे मुंबईमधील एनसीबीचे गाजलेले अधिकारी आहेत त्यांना गुजरातची जबाबदारी दिली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

गुजरातअमली पदार्थाची वाहतूक, सेवनाचे सर्वांत मोठे पोर्ट

गुजरात हे अमली पदार्थाच्या वाहतुकीचे, सेवनाचे सर्वात मोठे पोर्ट झालेले दिसत आहे. ही गंभीर गोष्ट आहे. संपूर्ण देशाला एखाद्या नशेत गुंग करण्यासाठी गुजरातच्या भूमीचा वापर होतोय का, यासाठी पंतप्रधानांनी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या महिन्यात एटीएसने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका बांधकामाधीन घरातून सुमारे ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन ड्रग्जची खेप जप्त केली होती. पाकिस्तानी ड्रग्ज विक्रेत्यांनी ही खेप अरबी समुद्रमार्गे त्यांच्या भारतीय समकक्षांना पाठवली होती, असे एटीएसने म्हटले होते. तत्पूर्वी, कच्छमधील मुंद्रा बंदरात भारतातील सर्वांत मोठ्या हेरॉईनचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केला होता. दोन कंटेनरमधून सुमारे ३ हजार किलो ड्रग्ज जप्त केले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत २१ हजार कोटी रुपये होती. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थSanjay Rautसंजय राऊतprime ministerपंतप्रधानGujaratगुजरात