शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पाक कलाकारांना भारतात 'एन्ट्री' कायम

By admin | Updated: October 15, 2016 12:01 IST

पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याचा कोणताही निर्णय अद्याप तरी घेण्यात आलेला नाही, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.15 - 'पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याचा कोणताही निर्णय अद्याप तरी घेण्यात आलेला नाही', अशी माहिती गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक ताणले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानी कलाकारांना मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याची केंद्र सरकारची सध्या कोणतीही योजना नाही, अशी माहिती समोर येत आहे.
 
उरी दहशतवादी हल्ल्याबाबत संताप व्यक्त करत 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'नेही पाकिस्तानी कलाकारांना ताबडतोड भारत सोडण्याचा इशारा दिला होता. तसेच 'पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही', अशी ठाम भूमिकाही मांडली. दरम्यान 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युर्स असोसिएशन'नेही (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे बॉलिवूडमधील काही जणांनी समर्थन केले आहे. मात्र, या निर्णयामुळे करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल', शाहरुखचा 'रईस' सिनेमा अडचणीत सापडले आहेत. कारण सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खानचा समावेश आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यामुळे सिनेमांच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आणखी बातम्या
18 सप्टेंबर रोजी उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 20 जवान शहीद झाले. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 27 आणि 28 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने वारंवार दहशतवादी हल्ला करणा-या पाकिस्तानला अद्दल घडवायचे ठरवले आहे, त्यासाठी पाकिस्तानची जागतिक पातळीवर कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.