शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हाथरस प्रकरणामुळे दुखावलेल्या वाल्मिकी समाजाच्या ५० कुटुंबांनी स्वीकारला बौद्ध धर्म

By कुणाल गवाणकर | Updated: October 22, 2020 14:55 IST

hathras case: सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्यानं वाल्मिकी समाजातल्या कुटुंबाचा निर्णय

गाझियाबाद: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. या घटनेचे तीव्र सामाजिक पडसाद उत्तर प्रदेशात पाहायला मिळत आहेत. गाझियाबादमधल्या करहेडामधल्या वाल्मिकी समाजातल्या ५० कुटुंबांनी धर्मांतर केलं आहे. एकूण २३६ जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांच्या उपस्थितीत त्यांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.हाथरस प्रकरणामुळे अतिशय दु:ख झाल्याची भावना बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या वाल्किमी कुटुंबांनी व्यक्त केली. 'आमच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे. आर्थिक विवंचनेचा सामना करत असूनही प्रकरणांची सुनावणी घेतली जात नाही,' अशी व्यथा बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या कुटुंबीयांनी मांडली. या कुटुंबांना भारतीय बौद्ध महासभेकडून एक प्रमाणपत्र देण्यात आलं.आमच्या गावातल्या ५० कुटुंबांमधल्या २३६ जणांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याचं बीर सिंह यांनी सांगितलं. 'बौद्ध धर्म स्वीकारण्यांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. त्यांनी यासाठी कोणतंही शुल्क घेतलेलं नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर समाजसेवा करा, असं त्यांनी सांगितलं,' अशी माहिती सिंह यांनी दिली.१४ सप्टेंबरला हाथरसमधील बुलगढी गावातल्या वाल्मिकी समाजाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीची जीभही कापून टाकण्यात आली. रुग्णालयात कित्येक दिवस पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र तिची झुंज अपयशी ठरली. यानंतर वाल्मिकी समाजात आक्रोश पाहायला मिळाला. सध्या सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चारही आरोपी अलिगढमधील तुरुंगात आहेत. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार