शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 19:17 IST

सीमावर्ती भागातील लोकांनी बंकरची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.

Pahalgam Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचचली आहेत. त्यामुळे पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ज्याचा परिणाम जम्मू काश्मीरमधील सीमावर्ती गावांमध्येही दिसून येत आहे. सीमावर्ती भागातील लोकांनी बंकरची साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सीमेवर युद्धाची तयारी सुरु झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. कोणत्याही कारवाई दरम्यान, आम्हाला आमच्या सैन्यासाठी अडथळा बनायचे नसल्याचे गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पहलगामधील हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान, सीमेजवळ राहणाऱ्या लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई करण्यात येत आहे. सीमेवर गोळीबार असो किंवा युद्ध, या काळात काश्मिरी लोक आपले घर सोडून सुरक्षित बंकरमध्ये राहतात.

पूंछ जिल्ह्यातील सीमेजवळ राहणाऱ्या गावांमध्ये सध्या गावकरी त्यांचे बंकर स्वच्छ करण्यात आणि आवश्यक वस्तू गोळा करण्यात व्यस्त आहेत. हे बंकर भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष प्रयत्नांनी बांधले गेले आहेत. या बंकरमुळे त्यांना गोळीबाराच्या वेळी गाव सोडून पळून जावे लागणार नाही आणि आम्ही स्वतःच्या गावात सुरक्षितपणे राहू शकू असे गावकरी सांगत आहेत.

"आधी तर आम्ही भाकित करु शकत नव्हतो की सीमेवर गोळीबार केव्हा होईल. इथे कधीही काहीही होऊ शकतं. म्हणून, घरगुती बंकर बहुतेक तयार मिळतात. पण आपल्याला मोठे बंकर तयार करावे लागतात. पहलगाममध्ये जे झालं त्याला उत्तर नाही दिलं ती शरमेची बाब ठरेल. आम्ही सीमेवर राहतो त्यामुळे जे काही होईल त्याचा परिणाम आमच्यावर होणार आहे. आम्हाला आमच्या सैन्यासाठी अडथळा बनायचे नाही. आता जे व्हायचे आहे ते आरपार होऊ द्या. कारण त्यांनी जे केलं आहे त्यांच्या दुःखासमोर आमचे दुःख काहीच नाही. आम्हाला त्यांना अजिबात असे वाटू द्यायचे नाही की सीमावर्ती भागातील लोक सुरक्षित असतील की नाही. म्हणून, आम्ही हे बंकर तयार करत आहोत," असे एका महिलेने सांगितले.

भारत सरकारने बांधलेले हे बंकर केवळ खूप मजबूत नाहीत तर बुलेटप्रूफ देखील आहेत. हे जमिनीपासून १० फूट खाली बांधले गेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गोळीबाराची किंवा हल्ल्याची भीती नाही. कारगिल युद्धादरम्यान आम्हाला स्थलांतर करावे लागले होते, पण आता बंकरमुळे आम्ही आमच्या गावात सुरक्षित आहोत, असेही गावकऱ्यांनी म्हटलं. महिलांकडून बंकरमध्ये गॅस सिलिंडर, रेशन, ब्लँकेट आणि बेडिंग इत्यादी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर