शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 21:50 IST

"पाकिस्तानची लढाऊ विमाने बांगलादेशात तैनात आहेत. जर काही घडले तर यावेळी विमाने एका सीमेवरून नव्हे तर दोन सीमेवरून उडतील."

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा तणाव शिगेला पोहोचला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कारवाई करत, सिंधू पाणी करार स्थगित करण्याबरोबरच इतरही अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. युद्धाच्या चर्चाही सुरू आहेत. यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच, जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तानही गप्प बसणार नाही. यावेळी विमाने एका नव्हे तर दोन्ही सीमेवरून उडतील, असे एका पाकिस्तानी पत्रकाराने म्हटले आहे. 

पाकिस्तानी वाहिनी समा टीव्हीच्या पॉडकास्टमध्ये जावेद फारुकी नावाच्या एका पत्रकाराने म्हटले आहे की, "पाकिस्तानची लढाऊ विमाने बांगलादेशात तैनात आहेत. जर काही घडले तर यावेळी विमाने एका सीमेवरून नव्हे तर दोन सीमेवरून उडतील. भारताने हा भागा ज्या पद्धतीने आपल्या नियंत्रणात ठेवला होता. आता तसे नाही. सिक्योरिटी आता त्यांच्या हातात नाही. नेपाळ आणि मानमारसारखे देशही भारतावर नाराज आहेत."

हा पत्रकार पुढे म्हणाला, "भारत आणि पाकिस्तान या दोन अणुशक्ती आहेत. त्यांचे सैन्य आपल्यापेक्षा मोठे अथवा अधिक शक्तिशाली आहे, असे समजू नका. अणुशक्तीचा विचार करता, त्यांचे सैन्य पाच पट अधिक असो वा दहा पट, अणुशक्ती बरोबरीची आहे. अशा स्थितीत, कुणीही मोठा अथवा लहाण नाही. सैन्याचा विचार करता, दहशतवाद्यांसोबत लढण्याचा आपला मोठा अनुभव आहे. आता लहान दहशतवाद्यांसोबत लढण्याऐवजी मोठ्या दहशतवाद्यांशी लढू."

भारत-पाकिस्तान युद्धासंदर्भात बोलताना हा पत्रकार म्हणाला, "गेल्या २५ वर्षांचा विचार करता, आपण पाकिस्तानसोबत युद्ध करणार, असे भारत कधीही उघडपणे जाहीर करणार नाही. कदाचित तो छोटीमोठी कारवाई करू शकतो. तीही तेथील माध्यमांना दाखवण्यासाठी." 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला