शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 10:21 IST

Pahalgam Terror Attack Government Meeting: पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेत अशी कोणती चूक झाली की, दहशतवाद्यांचं फावलं, याबद्दल सरकारने माहिती दिली. 

Pahalgam Terror Attack Latest News: पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये हल्ला झाल्यानंतर पहिला प्रश्न उपस्थित केला जात आहे की, इतके पर्यटक असलेल्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांकडूनही हाच मुद्दा मांडला गेला. या प्रश्नाचं उत्तर अखेर केंद्र सरकारने दिलं आहे. हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सुरक्षा व्यवस्थेत कुठे चूक झाली? हल्ला झालेल्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर सरकारने सविस्तर माहिती दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, हा हल्ला गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे का? सुरक्षा व्यवस्थेत चूक झालेली नाहीये का? असे मुद्दे विरोधकांनी बैठकीत उपस्थित केले. यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले की, हे शोधण्यासाठी चौकशी केली जात आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये हल्ला झाला, याचाही तपास केला जात आहे. 

पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये सुरक्षा जवान का नव्हते?

पहलगामपासून काही किमी अंतरावर असलेल्या बैसरन घाटीमध्ये निशस्त्र पर्यटकांना घेरून दहशतवाद्यांनी हत्या केली. या ठिकाणीही कोणतीही सुरक्षा नव्हती. घटना घडलेल्या ठिकाणी लष्कराचे जवान तैनात का नव्हते? असा मुद्दा बैठकीत विचारण्यात आला. 

वाचा >>पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सरकारने बैठकीत सांगितलं की, 'दरवर्षी हा मार्ग अमरनाथ यात्रेसाठी जून महिन्यात खुला केला जातो. अमरनाथला जाणारे भाविक पहलगाममध्ये थांबतात, आराम करतात. पण, यावेळी स्थानिक टूर्स ऑपरेटर्संनी सरकारला न सांगताच बुकींग सुरू केली. टूर ऑपरेटर्संनी २० एप्रिलपासूनच पर्यटकांना त्या ठिकाणी नेण्यास सुरूवात केली होती.' 

'स्थानिक प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. दरवर्षी जून महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी इथे सुरक्षा जवान तैनात केले जातात', असे उत्तर सरकारने बैठकीत दिले. 

असदुद्दीन ओवेसींच्या प्रश्नावर सरकारचे उत्तर काय?

सरकारने सिंधू नदीचे पाणी बंद केले आहे. त्याबद्दल खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला. जर भारताकडे पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाहीये, तर पाणी बंद करण्याचा फायदा काय?

त्यावर सरकारने सांगितले की, भारत कठोर कारवाई करू शकतो, हा मेसेज देण्यासाठी सिंधूचे पाणी बंद करण्यात आले आहे. यातून भारत पुढे काय करू शकतो, हा मेसेज जाईल. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीCentral Governmentकेंद्र सरकार