शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:27 IST

अमेरिकेसाठी आम्ही हे घाणेरडे काम केले, आता त्या चुकीची शिक्षा भोगावी लागतेय

लंडन - पाकिस्ताननेच आतापर्यंत दहशतवाद्यांना पोसले असल्याचे सत्य अखेर समोर आले आहे. खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी याची कबुली दिली आहे. आमच्या देशाने गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद्यांना पाठिंबा, प्रशिक्षण आणि निधी देण्याचे काम केले आहे. अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांसाठी हे ‘घाणेरडे काम’ आम्हाला करावे लागत असून, पाकिस्तानला या चुकीची किंमत मोजावी लागली आहे, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.

ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी ब्रिटिश वृत्तपत्र ‘द स्काय’ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. ब्रिटिश अँकर यल्दा हकीम यांनी त्यांना विचारले की, दहशतवादी गटांच्या कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे का? यावर ते म्हणाले की, जागतिक शक्तींनी त्यांच्या फायद्यासाठी पाकिस्तानचा वापर केला. आसिफ यांनी कबूल केले की, दहशतवाद्यांना पाठिंबा देणे किंवा प्रशिक्षण देणे ही एक मोठी चूक होती. याची शिक्षा आम्ही भोगत आहोत. जर आपण सोव्हिएत युनियनविरुद्धच्या युद्धात सामील झालो नसतो आणि ९/११ च्या हल्ल्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली, ती झाली नसती तर पाकिस्तानचे रेकॉर्ड निष्कलंक राहिले असते.

आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये मजा करत होते या प्रदेशात जे काही घडत आहे, त्यासाठी पाकिस्तानला दोष देणे मोठ्या शक्तींना सोयीस्कर आहे. १९८० च्या दशकात जेव्हा आम्ही सोव्हिएत युनियनविरुद्ध त्यांच्या वतीने युद्ध लढत होतो, तेव्हा आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये मजा करत होते आणि मग ९/११ चा हल्ला झाला. तीच परिस्थिती पुन्हा घडली. मला वाटते की आमच्या सरकारांनी त्यावेळी चूक केली होती. त्यावेळी पाकिस्तानचा वापर ‘प्रॉक्सी’ (मुखवटा) म्हणून केला जात होता, असेही त्यांनी सांगितले.

ती दहशतवादी संघटनाच संपलीपहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानवर लावलेले आरोप आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘द रेझिस्टेन्स फ्रंट’ची बंदी घातलेली संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी)शी संबंध असल्याबद्दल मंत्र्यांना विचारण्यात आले असता आसिफ म्हणाले की, लष्कर-ए-तैयबा आता पाकिस्तानात नाही. ती संपली आहे. जर मूळ संघटना अस्तित्वात नसेल तर येथे शाखा कशी निर्माण होऊ शकते? 

...तर थेट युद्ध होईल, दोन्ही देशांकडे अण्वस्त्रेपहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानला तणाव वाढण्याची भीती आहे का, असे विचारले असता, मंत्री म्हणाले की, पाकिस्तान त्यांच्या पद्धतीनेच प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. भारताच्या कोणत्याही कारवाईला आम्ही तसाच प्रतिसाद देऊ. हे एक विचारपूर्वक उचललेले पाऊल असेल. जर ताकदीने हल्ला झाला किंवा असे काही झाले तर थेट युद्ध होईल. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने जगाने काळजी करावी, असे ते म्हणाले. मात्र, दोन्ही देश चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिका