शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:17 IST

जर आम्ही दोन मिनिटेही वाट पाहिली असती तर कदाचित आम्ही इथे पोहोचलो नसतो, असेही तिने सांगितले.

पहलगाम - पहलगामच्या बैसरन घाटीत सोमवारची संध्याकाळ अचानक दहशतीत बदलली. पर्यटक मिनी स्वीत्झर्लंडमधून बाहेर येताच २० फूट अंतरावरून गोळीबार सुरू झाला; पण कोणीही गोळीबार करताना दिसले नाही. लोक एकमेकांवर पडून आणि चिरडून लोक फक्त चार फूट रुंद दरवाजातून जंगलाकडे धावत होते.

तिलक रूपचंदानी यांच्या पत्नीने जीव वाचवण्यासाठी टेकडीवरून उडी मारली आणि तिचे दोन्ही पाय फ्रैक्चर झाले. तिलक रूपचंदानी म्हणाले की, बराच वेळ गोळ्यांचा आवाज ऐकू येत होता; पण मागे वळण्याची हिंमत कोणातच झाली नाही. त्यांच्या पत्नीने सांगितले की, गर्दीत त्यांना शोधण्यासाठी कोणाकडेही वेळ नव्हता. चार-पाच हजार लोक देवाचे नाव घेत पुढे जात राहिले. जर आम्ही दोन मिनिटेही वाट पाहिली असती तर कदाचित आम्ही इथे पोहोचलो नसतो, असेही तिने सांगितले.

हिंदू नाव ऐकताच गोळीबारहल्लेखोरांनी प्रथम नाव विचारले आणि हिंदू नाव ऐकताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे आणि शोधमोहीम सुरू केली आहे. जखमींवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. त्यात अनेक लोक रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडले आहेत. तसेच महिला पर्यटक हंबरडा फोडत त्यांच्या आप्तजनांचा शोध घेताना दिसत होते. काही पर्यटक या हल्ल्यामुळे खूप हादरले होते व स्थानिक नागरिक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते.

हल्ल्याची बातमी कळताच पहलगामचे रस्ते ओस पडलेदहशतवादी हल्ल्याची बातमी कळताच पहलगाममधील रस्ते ओस पडले. मोठ्या संख्येने तिथे आलेले पर्यटक सुरक्षितस्थळी रवाना झाले. २००० मध्ये अमरनाथ बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३० पेक्षा अधिक जण ठार, ६० जण जखमी झाले. त्यानंतर २००१ मध्ये शेषनाग येथे १३ जण ठार, १५ जखमी आणि २००२ मध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये अमरनाथ यात्रेतून परतणाऱ्या ८ यात्रेकरूंवर गोळीबार करण्यात आला.

अनेक पर्यटक जमिनीवर पडले रक्ताच्या थारोळ्यातहल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी मदतीसाठी हंबरडा फोडल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. काही पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अतिशय क्रूर पद्धतीने हा हल्ला करण्यात आला.. जंगलातून काही दहशतवादी आले व त्यांनी ४० पर्यटकांना घेराव घालून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराला सुरुवात होताच येथील स्थानिकांनी जीव वाचविण्यासाठी तिथून पलायन केले. मात्र, पर्यटकांना तिथून निसटणे शक्य झाले नाही. या गोळीबारातून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, माझ्या नवऱ्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. तो विशिष्ट धर्माचा असल्यामुळे त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

३ जुलैपासूनच्या अमरनाथ यात्रेत हवी कडक सुरक्षाकाश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी हा भीषण हल्ला झाला. येत्या ३ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असून, ती ३८ दिवस चालणार आहे. पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला