शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:16 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर अजित डोभाल यांनी सुत्रे हाती घेतली आहेत.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधी आणखी बिघडले आहेत. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानलाभारताकडून हल्ल्या होण्याची भीती सतावत आहे. ही भीती रास्त आहे, कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला, तेव्हाही भारताने तात्काळ पाकवर हवाई हल्ला केला होता. त्यामुळेच आता पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतर आता एनएसए अजित डोभाल कामाला लागले आहेत.

अजित डोवाल एका नवीन रणनीतीअंतर्गत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत. 2014 मध्ये एका विद्यापीठात दिलेल्या भाषणादरम्यान अजित डोभाल यांनी पाकिस्तानविरुद्ध 'बचावात्मक हल्ल्याची' रणनीती स्पष्ट केली होती. त्यांचा असा विश्वास होता की, भारताचा आतापर्यंतचा दृष्टिकोन प्रामुख्याने बचावात्मक राहिला आहे, ज्यामध्ये आपण फक्त पाकिस्तानच्या कृतींना प्रत्युत्तर देतो. या रणनीतीमध्ये भारताला नेहमीच नुकसान सहन करावे लागते.

पाकिस्तानने 'मुंबई' केली, तर त्यांनी 'बलुचिस्तान' गमावण्यास तयार असले पाहिजे, असे डोभाल म्हणाले होते. त्यांचा संदेश असा होता की, भारताने आता केवळ बचावात्मक राहण्याऐवजी पाकिस्तानच्या अंतर्गत कमकुवतपणावर हल्ला करावा. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करणेदेखील समाविष्ट आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या माध्यमातूनही पाकिस्तानवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

आता कालच्या पहलगाम हल्ल्यानंतर डोभाल यांनी या रणनीतीअंतर्गत पाकिस्तानला वेगळे करण्याची योजना आखल्याचे मानले जाते. असेही म्हटले जात आहे की, पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण यावेळी तिथले लोकही पाकिस्तानी सैन्यावर खूप संतापले आहेत. पाकिस्तानमध्ये सर्वत्र सरकारविरुद्ध खूप गदारोळ सुरू आहे. 

भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचा आवडता चीन देखील भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे, असे म्हणता येईल. आता डोभाल यांच्यासारखा अनुभवी अधिकारी पाकिस्तानला कडक संदेश देण्याची रणनिती आखत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भारत मोठी कारवाई करू शकते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAjit Dovalअजित डोवालJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान