शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:16 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर अजित डोभाल यांनी सुत्रे हाती घेतली आहेत.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधी आणखी बिघडले आहेत. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानलाभारताकडून हल्ल्या होण्याची भीती सतावत आहे. ही भीती रास्त आहे, कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला, तेव्हाही भारताने तात्काळ पाकवर हवाई हल्ला केला होता. त्यामुळेच आता पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतर आता एनएसए अजित डोभाल कामाला लागले आहेत.

अजित डोवाल एका नवीन रणनीतीअंतर्गत पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत. 2014 मध्ये एका विद्यापीठात दिलेल्या भाषणादरम्यान अजित डोभाल यांनी पाकिस्तानविरुद्ध 'बचावात्मक हल्ल्याची' रणनीती स्पष्ट केली होती. त्यांचा असा विश्वास होता की, भारताचा आतापर्यंतचा दृष्टिकोन प्रामुख्याने बचावात्मक राहिला आहे, ज्यामध्ये आपण फक्त पाकिस्तानच्या कृतींना प्रत्युत्तर देतो. या रणनीतीमध्ये भारताला नेहमीच नुकसान सहन करावे लागते.

पाकिस्तानने 'मुंबई' केली, तर त्यांनी 'बलुचिस्तान' गमावण्यास तयार असले पाहिजे, असे डोभाल म्हणाले होते. त्यांचा संदेश असा होता की, भारताने आता केवळ बचावात्मक राहण्याऐवजी पाकिस्तानच्या अंतर्गत कमकुवतपणावर हल्ला करावा. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश करणेदेखील समाविष्ट आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या माध्यमातूनही पाकिस्तानवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

आता कालच्या पहलगाम हल्ल्यानंतर डोभाल यांनी या रणनीतीअंतर्गत पाकिस्तानला वेगळे करण्याची योजना आखल्याचे मानले जाते. असेही म्हटले जात आहे की, पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण यावेळी तिथले लोकही पाकिस्तानी सैन्यावर खूप संतापले आहेत. पाकिस्तानमध्ये सर्वत्र सरकारविरुद्ध खूप गदारोळ सुरू आहे. 

भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचा आवडता चीन देखील भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता, पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे, असे म्हणता येईल. आता डोभाल यांच्यासारखा अनुभवी अधिकारी पाकिस्तानला कडक संदेश देण्याची रणनिती आखत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भारत मोठी कारवाई करू शकते.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAjit Dovalअजित डोवालJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान